औरंगाबाद : गायरान जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करावे आणि उच्च न्यायालयाने गायरान जमिनीवरील अतिक्रमण बाबत दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्य सरकारने पुनर्विलोकन याचिका दाखल करावी, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) वतीने बुधवारी विभागीय आयुक्तालयासमोर निदर्शने करण्यात आली.
प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्य सरकारने गायरान जमिनीवरील अतिक्रमणे हटविण्याबाबत गायरान धारकांना नोटीस बजावली आहे. या निर्णयामुळे या निकालामुळे वर्षोनुवर्ष गायरान जमिनीवर अतिक्रमण करुन आपला उदरनिर्वाह करणाऱ्या नागरिकांवर मोठे संकट कोसळले आहे. गायरान जमिनीवर उदरनिर्वाहासाठी केलेली अतिक्रमणे न काढता शासनाने उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
यासह रमाई घरकुल योजना, पंतप्रधान आवास योजनेमार्फत गावात घरे बांधावी, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ व महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाला निधी देऊन कर्ज प्रकरणे तातडीने निकाली काढावी, आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या. याप्रसंगी पक्षनेते मिलिंद शेळके, दौलत खरात, संजय ठोकळ, नागराज गायकवाड, बाळकृष्ण इंगळे, प्रकाश गायकवाड, राकेश पंडित यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्य सरकारने गायरान जमिनीवरील अतिक्रमणे हटविण्याबाबत गायरान धारकांना नोटीस बजावली आहे. या निर्णयामुळे या निकालामुळे वर्षोनुवर्ष गायरान जमिनीवर अतिक्रमण करुन आपला उदरनिर्वाह करणाऱ्या नागरिकांवर मोठे संकट कोसळले आहे. गायरान जमिनीवर उदरनिर्वाहासाठी केलेली अतिक्रमणे न काढता शासनाने उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
यासह रमाई घरकुल योजना, पंतप्रधान आवास योजनेमार्फत गावात घरे बांधावी, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ व महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाला निधी देऊन कर्ज प्रकरणे तातडीने निकाली काढावी, आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या. याप्रसंगी पक्षनेते मिलिंद शेळके, दौलत खरात, संजय ठोकळ, नागराज गायकवाड, बाळकृष्ण इंगळे, प्रकाश गायकवाड, राकेश पंडित यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.