नांदेड: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप प्रभारी म्हणून काम पाहणारे व भाजपला यश मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावणारे देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत माजी मुख्यमंत्री व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मोठे भाकीत केले आहे. ( Ashok Chavan Slams Devendra Fadnavis And BJP )
वाचा: ठाकरे सरकार टिकणार की कोसळणार?; सुप्रिया सुळे यांचे मोठे विधान
माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे बिहार विधानसभा निवडणुकीपासून भाजपच्या राष्ट्रीय व्यासपीठावर दिसू लागले आहेत. बिहारनंतर हैदराबाद महापालिकेसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यासाठीही फडणवीस यांना प्रमुख अतिथी म्हणून मान देण्यात आला. या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी केलेलं विधान अधिकच महत्त्वाचं ठरलं आहे.
वाचा: राष्ट्रवादीने आघाडीधर्म पाळला; शिवसेनेच्या विरोधातील 'त्या' बंडखोराची हकालपट्टी
राज्यात विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधरच्या पाच जागांसाठी निवडणूक होत आहे. ही निवडणूक महाविकास आघाडी जिंकणार असून हा निकाल आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत जावं लागणार आहे. भाजपचं राष्ट्रीय नेतृत्व त्यांना महाराष्ट्रात ठेवणार नाही. त्यांना दिल्लीत बोलावून घेतलं जाईल, असा दावा अशोक चव्हाण यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांचे 'मी पुन्हा येईन' परत एकदा सुरू झाले आहे. अर्थात कार्यकर्ते टिकवण्यासाठी हे सरकार जाणार, आपले सरकार येणार, अशा वावड्या उठवाव्या लागतात. पण काही झाले तरी फडणवीसांचे हे स्वप्न पूर्ण होणार नाही. राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे पूर्ण करणार आहे. त्यामुळे विरोधकांनी सत्तेची स्वप्ने पाहू नयेत, असा सल्लाही अशोक चव्हाण यांनी दिला.
वाचा: ठाकरे सरकार कोसळल्यानंतर काय होणार? नारायण राणेंनी सुचवले दोन पर्याय
राज्यातील सध्याचं सरकार बोलबच्चन सरकार असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला होता. त्याला चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले. बोलबच्चन हा शब्द खरंतर तुमच्या केंद्रातील सरकारलाच लागू पडतो, असे नमूद करताना १५ लाख रुपये बँक खात्यात जमा करणार, दोन कोटी नोकऱ्या देणार, नोटाबंदी यशस्वी होणार ही आश्वासने कोणी दिली होती व त्याचे काय झाले ते सांगा, असे आव्हानच चव्हाण यांनी दिले. विधानपरिषदेच्या औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सतिश चव्हाण यांच्या प्रचारार्थ आज नांदेड येथे जाहीर सभा झाली. यावेळी चव्हाण बोलत होते. यावेळी भाजपवर निशाणा साधतानाच चव्हाण यांनी महाविकास आघाडीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.
वाचा: राज्यात ३१ डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवला; 'या' सवलती कायम राहणार
वाचा: ठाकरे सरकार टिकणार की कोसळणार?; सुप्रिया सुळे यांचे मोठे विधान
माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे बिहार विधानसभा निवडणुकीपासून भाजपच्या राष्ट्रीय व्यासपीठावर दिसू लागले आहेत. बिहारनंतर हैदराबाद महापालिकेसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यासाठीही फडणवीस यांना प्रमुख अतिथी म्हणून मान देण्यात आला. या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी केलेलं विधान अधिकच महत्त्वाचं ठरलं आहे.
वाचा: राष्ट्रवादीने आघाडीधर्म पाळला; शिवसेनेच्या विरोधातील 'त्या' बंडखोराची हकालपट्टी
राज्यात विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधरच्या पाच जागांसाठी निवडणूक होत आहे. ही निवडणूक महाविकास आघाडी जिंकणार असून हा निकाल आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत जावं लागणार आहे. भाजपचं राष्ट्रीय नेतृत्व त्यांना महाराष्ट्रात ठेवणार नाही. त्यांना दिल्लीत बोलावून घेतलं जाईल, असा दावा अशोक चव्हाण यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांचे 'मी पुन्हा येईन' परत एकदा सुरू झाले आहे. अर्थात कार्यकर्ते टिकवण्यासाठी हे सरकार जाणार, आपले सरकार येणार, अशा वावड्या उठवाव्या लागतात. पण काही झाले तरी फडणवीसांचे हे स्वप्न पूर्ण होणार नाही. राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे पूर्ण करणार आहे. त्यामुळे विरोधकांनी सत्तेची स्वप्ने पाहू नयेत, असा सल्लाही अशोक चव्हाण यांनी दिला.
वाचा: ठाकरे सरकार कोसळल्यानंतर काय होणार? नारायण राणेंनी सुचवले दोन पर्याय
राज्यातील सध्याचं सरकार बोलबच्चन सरकार असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला होता. त्याला चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले. बोलबच्चन हा शब्द खरंतर तुमच्या केंद्रातील सरकारलाच लागू पडतो, असे नमूद करताना १५ लाख रुपये बँक खात्यात जमा करणार, दोन कोटी नोकऱ्या देणार, नोटाबंदी यशस्वी होणार ही आश्वासने कोणी दिली होती व त्याचे काय झाले ते सांगा, असे आव्हानच चव्हाण यांनी दिले. विधानपरिषदेच्या औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सतिश चव्हाण यांच्या प्रचारार्थ आज नांदेड येथे जाहीर सभा झाली. यावेळी चव्हाण बोलत होते. यावेळी भाजपवर निशाणा साधतानाच चव्हाण यांनी महाविकास आघाडीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.
वाचा: राज्यात ३१ डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवला; 'या' सवलती कायम राहणार