औरंगाबाद: औरंगाबाद पाणी पुरवठा योजनेवरील जायकवाडी आणि फारोळा येथील पंपहाउस येथे अतिरिक्त वीजपुरवठा मिळवण्यासाठी महावितरणकडून रिंग मेन युनिट बसवले जाणार आहे. हे युनिट बसवण्यासाठी शुक्रवारी (२८ जून) सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत शटडाउन घेतले जाणार आहे. या बारा तासांच्या काळात औरंगाबाद शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. या काळात टँकरद्वारेही पाणीपुरवठा होणार नाही. रात्री आठ वाजता रिंग मेन युनिट बसवण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर टप्प्या टप्प्याने पाणीपुरवठा सुरू केला जाणार आहे. बारा तास पाणीपुरवठा बंद राहणार असल्यामुळे पुढील दोन दिवस पाणी पुरवठ्यावर होणार आहे. संपूर्ण शहराच्या पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक एक दिवसांनी पुढे ढकलले जाईल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.
पाणीपुरवठा होणार दोन दिवस विस्कळीत
औरंगाबाद पाणी पुरवठा योजनेवरील जायकवाडी आणि फारोळा येथील पंपहाउस येथे अतिरिक्त वीजपुरवठा मिळवण्यासाठी महावितरणकडून रिंग मेन युनिट बसवले जाणार आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Jun 2019, 4:00 am