म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दिवाळी असो की दसरा. आपण समजतो, त्यांना सणवार खरेच कळतात का...हो त्यांनाही आता सगळे काही उमजते आहे. त्यामुळेच नवजीवन मतिमंद शाळेच्या विद्यार्थिनींनी केलेल्या चविष्ट चॉकलेटला दुपटीने मागणी वाढली असून, आतापर्यंत सुमारे ४० किलोपेक्षा जास्त चॉकलेटची बुकिंग झाली आहे.
नारेगाव येथील नवजीवन मतिमंद मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी चॉकलेट मेकिंगमध्ये आपला वेगळा खास ठसा उमटविला आहे. गतिमंद मुलांना स्वावलंबी आणि सक्षम व्हावे, त्यांचा सर्वागिण विकास व्हावा, यासाठी नवजीवन संस्था गेल्या ३२ वर्षांपासून कार्य करत आहे. या मुलांना छोटेखानी उद्योग सुरू करता यावा, यासाठी गेल्या दहा वर्षांपासून आवळा कॅंडी, चॉकलेट तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. या संस्थेतील अनेक मुली आता तरबेज झाल्या असून ऑर्डरप्रमाणे त्या चॉकलेट तयार करतात. प्लेन, ड्रायफ्रूडस् यासह एकूण सात प्रकारचे चॉकलेट तयार केले जात असून दिवाळीसणात किमान ६० ते ७० किलो चॉकलेटची विक्री होईल, असा अंदाज संस्थेच्या शर्मिला गांधी व अभिजित जोशी यांनी व्यक्त केला.
‘समर्थां’चे आकाशदिवे
श्री. स्वामी समर्थ बालकाश्रमाच्या बच्चेकंपनीने तयार केलेल्या आकाशदिव्यांनी यंदाची दिवाळी उजळणार आहे. बीड बायपासजवळ या आश्रमात स्वकियांच्या प्रेमाला पारखे झालेल्या अनेक अनाथ, निराधार, गरजू बालकांचा सांभाळ केला जातो. समाजाचे आपण काही देणे लागतो, याविचारतून डॉ. एस. एम. सानप यांनी पुढाकार घेत २००५मध्ये या आश्रमाची स्थापना केली. आजघडीला संस्थेत ५२ बालके आश्रयास आहेत. संस्था परिसर दिव्यांनी प्रकाशमान व्हावा, यासाठी मुलांनी स्वतः खास डिझायनर दिव्यांना रंगरंगोटी केली. कल्पता लढवत खास आकाशदिवे तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. संस्थेशी जोडल्या गेलेल्या नागरिकांना, पालकत्व घेतलेल्या व्यक्तींना हे आकाशकंदील भेट म्हणून दिले जाणार असून, विक्रीसाठीही उपलब्ध आहेत. यातून मिळणाऱ्या पैशांतून विद्यार्थ्यांच्या शालेय गरजा पूर्ण करण्यास हातभार लागणार आहे.
दिवाळी असो की दसरा. आपण समजतो, त्यांना सणवार खरेच कळतात का...हो त्यांनाही आता सगळे काही उमजते आहे. त्यामुळेच नवजीवन मतिमंद शाळेच्या विद्यार्थिनींनी केलेल्या चविष्ट चॉकलेटला दुपटीने मागणी वाढली असून, आतापर्यंत सुमारे ४० किलोपेक्षा जास्त चॉकलेटची बुकिंग झाली आहे.
नारेगाव येथील नवजीवन मतिमंद मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी चॉकलेट मेकिंगमध्ये आपला वेगळा खास ठसा उमटविला आहे. गतिमंद मुलांना स्वावलंबी आणि सक्षम व्हावे, त्यांचा सर्वागिण विकास व्हावा, यासाठी नवजीवन संस्था गेल्या ३२ वर्षांपासून कार्य करत आहे. या मुलांना छोटेखानी उद्योग सुरू करता यावा, यासाठी गेल्या दहा वर्षांपासून आवळा कॅंडी, चॉकलेट तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. या संस्थेतील अनेक मुली आता तरबेज झाल्या असून ऑर्डरप्रमाणे त्या चॉकलेट तयार करतात. प्लेन, ड्रायफ्रूडस् यासह एकूण सात प्रकारचे चॉकलेट तयार केले जात असून दिवाळीसणात किमान ६० ते ७० किलो चॉकलेटची विक्री होईल, असा अंदाज संस्थेच्या शर्मिला गांधी व अभिजित जोशी यांनी व्यक्त केला.
‘समर्थां’चे आकाशदिवे
श्री. स्वामी समर्थ बालकाश्रमाच्या बच्चेकंपनीने तयार केलेल्या आकाशदिव्यांनी यंदाची दिवाळी उजळणार आहे. बीड बायपासजवळ या आश्रमात स्वकियांच्या प्रेमाला पारखे झालेल्या अनेक अनाथ, निराधार, गरजू बालकांचा सांभाळ केला जातो. समाजाचे आपण काही देणे लागतो, याविचारतून डॉ. एस. एम. सानप यांनी पुढाकार घेत २००५मध्ये या आश्रमाची स्थापना केली. आजघडीला संस्थेत ५२ बालके आश्रयास आहेत. संस्था परिसर दिव्यांनी प्रकाशमान व्हावा, यासाठी मुलांनी स्वतः खास डिझायनर दिव्यांना रंगरंगोटी केली. कल्पता लढवत खास आकाशदिवे तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. संस्थेशी जोडल्या गेलेल्या नागरिकांना, पालकत्व घेतलेल्या व्यक्तींना हे आकाशकंदील भेट म्हणून दिले जाणार असून, विक्रीसाठीही उपलब्ध आहेत. यातून मिळणाऱ्या पैशांतून विद्यार्थ्यांच्या शालेय गरजा पूर्ण करण्यास हातभार लागणार आहे.