अ‍ॅपशहर

पऱ्हाट्यांच्या गंजी साठवू नका

कापूस पिकांवर सेंद्रीय बोंडअळीने मोठे नुकसान झाले आहे. त्याचा पुढील हंगामात पुन्हा उद्रेक होऊ नये, त्यासाठी फरदड न घेता पऱ्हाट्या रोटाव्हेटरव्दारे जमिनीत गाडाव्यात, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Maharashtra Times 28 Feb 2018, 2:21 pm
औरंगाबाद : कापूस पिकांवर सेंद्रीय बोंडअळीने मोठे नुकसान झाले आहे. त्याचा पुढील हंगामात पुन्हा उद्रेक होऊ नये, त्यासाठी फरदड न घेता पऱ्हाट्या रोटाव्हेटरव्दारे जमिनीत गाडाव्यात, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. त्यामुळे शेंदरी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित होईल, असेही कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम do not store pantha ganji
पऱ्हाट्यांच्या गंजी साठवू नका


मराठवाड्यात १६ लाखांहून अधिक हेक्टर क्षेत्रावर कापसांची लागवड झाली, पण बोंडअळीमुळे शेतकऱ्यांचे उभे कापूस पीक वाया आहे. आगामी खरीप हंगामात बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी कृषी विभागाने प्रयत्न सुरू केले आहे. कापूस पीक वेळेवर म्हणजे डिसेंबरअखेर काढून टाकावे, शेत स्वच्छ करावे. मार्च किंवा एप्रिलपर्यंत पऱ्हाट्या शेतातच उभ्या ठेवू नयेत. काढणीसाठी मल्टीक्रॉप श्रेडरचा वापर केल्यास किडग्रस्त बोंडांचा नायनाट करता येईल. बीटी कॉटन लावताना रेफ्युजी (नॉन बीटी) लावा, गुलाबी बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज