म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘चांगले विद्यार्थी-माणसे घडवणे शिक्षकाचे दायित्व असते. चारित्र्य व स्वाभिमान टिकवून डॉ. सतीश बडवे यांनी विद्यार्थी घडवण्याचे व्रत स्वीकारले. नोकरीत ज्या गोष्टी करणे अवघड गेले, त्या गोष्टी करण्यासाठी डॉ. बडवे सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अधिक जबाबदारी आहे’ असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक डॉ. अशोक कामत यांनी केले. डॉ. सतीश बडवे यांच्या सेवागौरव समारंभात ते बोलत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील माजी मराठी विभागप्रमुख डॉ. सतीश बडवे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त विद्यार्थ्यांनी कृतज्ञता सोहळा आयोजित केला होता. भानुदास चव्हाण सभागृहात रविवारी हा कार्यक्रम झाला. यावेळी मंचावर ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे, डॉ. अशोक कामत, प्रकाशक सुमती लांडे, डॉ. सतीश बडवे व जयंती बडवे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्मृतिचिन्ह देऊन विद्यार्थ्यांनी बडवे यांचा विशेष सत्कार केला. यावेळी बडवे यांच्या कार्यशैलीवर डॉ. कामत यांनी भाष्य केले. ‘जो मनुष्य नेहमी अभ्यास करतो तो चांगले शिकवू शकतो. बडवे नेहमीच अभ्यासात झोकून देत असल्यामुळे विद्यार्थिप्रिय ठरले. संत साहित्यात त्यांचे योगदान आहे. विद्यापीठात काम करताना वेळ वाया जाण्याची शक्यता असते. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर ते अधिक महत्त्वाचे काम करतील,’ असे कामत म्हणाले.
तर रंगनाथ पठारे म्हणाले, ‘सर्व जाती-धर्माला सामावून घेतलेल्या गंगा-जमुनी संस्कृतीचा बडवे यांनी नेहमीच उत्सव केला. कामाशी गुंतवून घेण्याची त्यांची वृत्ती आहे. या प्रकारचे गुण आत्मसात करून जगता आले पाहिजे हा धडा त्यांनी विद्यार्थ्यांना घालून दिला.’ या सत्काराला उत्तर देताना बडवे यांनी विद्यार्थी व गुरू यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
‘शिक्षकी पेशात येण्यापूर्वी पोटासाठी पत्रकारितेचे काम केले. कृतज्ञता बाजूला ठेवण्याची गोष्ट असल्याच्या भावनेतून शिकवले. विद्यार्थ्यांनी मला नेहमी सजग ठेवले. यातून मला घडण्याची प्रेरणा दिली. आपण अभ्यासाच्या सोयीसाठी हवाबंद कप्पे तयार केले आहेत. संत साहित्य, दलित साहित्य, आदिवासी साहित्य, ग्रामीण साहित्य असे कप्पे अधिक घट्ट झाले. त्यामुळे समीक्षा करण्यासारखे वातावरण राहिले नाही. चांगले काम असल्यास काम देणारेसुद्धा वाट पाहतात’ असे डॉ. बडवे म्हणाले.
दरम्यान, या कार्यक्रमात ‘संतसाहित्यमिमांसा’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रा. ताहेर पठाण, प्रा. सुधाकर शेलार, बाबूराव दूधगावकर, तुषार चांदवडकर, प्रा. एल. जी. सोनवणे, ज्ञानेश्वर गाडे, विजय शेवाळे, डॉ. अशोक देशमाने यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. समाधान इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. दैवत सावंत, प्रा. वाल्मिक वाघमारे, न. भ. कदम, प्रा. आशुतोष पाटील, प्रा. सचिन मुंडे, प्रणव बडवे आदींनी परिश्रम घेतले.
आता संशोधनाचे काम
सेवानिवृत्त झाल्यानंतर संशोधनात्मक काम करणार असल्याचे डॉ. सतीश बडवे यांनी जाहीर केले. राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या मध्ययुगीन साहित्यावरील प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पात पदरचनेबाबत संशोधन करून मांडणी करण्याचे काम डॉ. बडवे करणार आहेत. संत साहित्यावर सातत्याने दर्जेदार लेखन करून बडवे यांनी साहित्यात भरीव योगदान दिले आहे. ‘माझ्यावर गौरवग्रंथ काढून आरती ओवाळण्यापेक्षा संदर्भमूल्याचा ग्रंथ प्रकाशित करा,’ असे बडवे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले होते. त्यानुसार ‘संतसाहित्यमिमांसा’ या ग्रंथाची निर्मिती करण्यात आली.
‘चांगले विद्यार्थी-माणसे घडवणे शिक्षकाचे दायित्व असते. चारित्र्य व स्वाभिमान टिकवून डॉ. सतीश बडवे यांनी विद्यार्थी घडवण्याचे व्रत स्वीकारले. नोकरीत ज्या गोष्टी करणे अवघड गेले, त्या गोष्टी करण्यासाठी डॉ. बडवे सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अधिक जबाबदारी आहे’ असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक डॉ. अशोक कामत यांनी केले. डॉ. सतीश बडवे यांच्या सेवागौरव समारंभात ते बोलत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील माजी मराठी विभागप्रमुख डॉ. सतीश बडवे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त विद्यार्थ्यांनी कृतज्ञता सोहळा आयोजित केला होता. भानुदास चव्हाण सभागृहात रविवारी हा कार्यक्रम झाला. यावेळी मंचावर ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे, डॉ. अशोक कामत, प्रकाशक सुमती लांडे, डॉ. सतीश बडवे व जयंती बडवे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्मृतिचिन्ह देऊन विद्यार्थ्यांनी बडवे यांचा विशेष सत्कार केला. यावेळी बडवे यांच्या कार्यशैलीवर डॉ. कामत यांनी भाष्य केले. ‘जो मनुष्य नेहमी अभ्यास करतो तो चांगले शिकवू शकतो. बडवे नेहमीच अभ्यासात झोकून देत असल्यामुळे विद्यार्थिप्रिय ठरले. संत साहित्यात त्यांचे योगदान आहे. विद्यापीठात काम करताना वेळ वाया जाण्याची शक्यता असते. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर ते अधिक महत्त्वाचे काम करतील,’ असे कामत म्हणाले.
तर रंगनाथ पठारे म्हणाले, ‘सर्व जाती-धर्माला सामावून घेतलेल्या गंगा-जमुनी संस्कृतीचा बडवे यांनी नेहमीच उत्सव केला. कामाशी गुंतवून घेण्याची त्यांची वृत्ती आहे. या प्रकारचे गुण आत्मसात करून जगता आले पाहिजे हा धडा त्यांनी विद्यार्थ्यांना घालून दिला.’ या सत्काराला उत्तर देताना बडवे यांनी विद्यार्थी व गुरू यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
‘शिक्षकी पेशात येण्यापूर्वी पोटासाठी पत्रकारितेचे काम केले. कृतज्ञता बाजूला ठेवण्याची गोष्ट असल्याच्या भावनेतून शिकवले. विद्यार्थ्यांनी मला नेहमी सजग ठेवले. यातून मला घडण्याची प्रेरणा दिली. आपण अभ्यासाच्या सोयीसाठी हवाबंद कप्पे तयार केले आहेत. संत साहित्य, दलित साहित्य, आदिवासी साहित्य, ग्रामीण साहित्य असे कप्पे अधिक घट्ट झाले. त्यामुळे समीक्षा करण्यासारखे वातावरण राहिले नाही. चांगले काम असल्यास काम देणारेसुद्धा वाट पाहतात’ असे डॉ. बडवे म्हणाले.
दरम्यान, या कार्यक्रमात ‘संतसाहित्यमिमांसा’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रा. ताहेर पठाण, प्रा. सुधाकर शेलार, बाबूराव दूधगावकर, तुषार चांदवडकर, प्रा. एल. जी. सोनवणे, ज्ञानेश्वर गाडे, विजय शेवाळे, डॉ. अशोक देशमाने यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. समाधान इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. दैवत सावंत, प्रा. वाल्मिक वाघमारे, न. भ. कदम, प्रा. आशुतोष पाटील, प्रा. सचिन मुंडे, प्रणव बडवे आदींनी परिश्रम घेतले.
आता संशोधनाचे काम
सेवानिवृत्त झाल्यानंतर संशोधनात्मक काम करणार असल्याचे डॉ. सतीश बडवे यांनी जाहीर केले. राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या मध्ययुगीन साहित्यावरील प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पात पदरचनेबाबत संशोधन करून मांडणी करण्याचे काम डॉ. बडवे करणार आहेत. संत साहित्यावर सातत्याने दर्जेदार लेखन करून बडवे यांनी साहित्यात भरीव योगदान दिले आहे. ‘माझ्यावर गौरवग्रंथ काढून आरती ओवाळण्यापेक्षा संदर्भमूल्याचा ग्रंथ प्रकाशित करा,’ असे बडवे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले होते. त्यानुसार ‘संतसाहित्यमिमांसा’ या ग्रंथाची निर्मिती करण्यात आली.