म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
करोनाची साथ रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलेल्या काळात खाद्यतेलासह शेंगदाणे, मूग डाळीचे भाव वाढल्यामुळे सर्वसामान्य ग्राहक त्रस्त झाले आहेत. मागणी व पुरवठ्याचे गणित बिघडल, तसेच वाहतूक खर्चात वाढ झाल्यामुळे भाववाढ झाल्याचा दावा व्यापाऱ्यांनी केला आहे.
लॉकडाऊननंतर शहरात पाकिटबंद तेलाचा तुटवडा जाणवत होतो. सध्या काही प्रमाणात पुरवठा होत असला तरी खाद्यतेलाच्या दरात लिटरमागे दहा ते वीस रुपयांनी वाढ झाली आहे. लॉकडाऊननंतर सोयाबीन तेल दहा रुपये, सरकी तेल सहा रुपये, सूर्यफुल व शेंगदाणा तेलाचा भाव आठ रुपये प्रति लिटर याप्रमाणे वाढला आहे. नवीन करडी बाजारात आल्याने करडीच्या तेलाच्या दर कमी प्रति लिटर १६ रुपयांनी कमी झाले आहेत, अशी माहिती खाद्यतेल विक्रेते अशोक चौधरी यांनी 'मटा'ला दिली.
साखर व किराणा साहित्याचे भाव स्थिर आहेत. शेंगदाणे, मूग डाळीचे दर वाढले आहेत. दहा ते बारा दिवसांपूर्वी शेंगदाणे ९० ते शंभर रुपये होता, सध्या शंभर ते ११० रुपये प्रति किलो भाव आहे. शंभर ते ११० रुपये किलोने मिळणारी मूग डाळ १२५ ते १३० रुपये किलोने विकली जात आहे, अशी माहिती किराणा व्यापारी संजय कांकरिया यांनी 'मटा'ला दिली.
\Bतेल १० मार्च ३ एप्रिल \B
करडी १८० १६४
शेंगदाणा १२८ १३६
सूर्यफुल ९६ १०२
सोयाबीन ८८ ९०
तीळ १६० १६०
पाम ८० ८४
सरकी ८६ ९०
....
\B(सर्व दर प्रति लिटर रुपये असे आहेत.) \B