अ‍ॅपशहर

काँग्रेससाठी धोक्याची घंटा

ग्रामपंचायत निवडणुकीत औरंगाबाद जिल्ह्यात काँग्रेसला अपेक्षेप्रमाणे यश मिळाल्याचा दावा पक्षनेत्यांकडून होत आहे, पण या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ग्रामपंचायतींमध्येही प्रवेश केला आहे. आजवर ग्रामीण मतदाराचे पाठबळ असलेल्या काँग्रेससमोर आता भाजपचे कडवे आव्हान असणार भविष्यकाळात असणार आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेससाठी ही धोक्याची घंटा आहे.

Maharashtra Times 12 Oct 2017, 3:00 am
औरंगाबाद : ग्रामपंचायत निवडणुकीत औरंगाबाद जिल्ह्यात काँग्रेसला अपेक्षेप्रमाणे यश मिळाल्याचा दावा पक्षनेत्यांकडून होत आहे, पण या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ग्रामपंचायतींमध्येही प्रवेश केला आहे. आजवर ग्रामीण मतदाराचे पाठबळ असलेल्या काँग्रेससमोर आता भाजपचे कडवे आव्हान असणार भविष्यकाळात असणार आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेससाठी ही धोक्याची घंटा आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम election result danger for congress
काँग्रेससाठी धोक्याची घंटा


जिल्ह्यातील २१६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. यावेळी सरपंच थेट जनतेतून निवडायचा होता. जिल्ह्यातील ग्रामीण भागात काँग्रेसचे जाळे आहे. काँग्रेसचा ग्रामीण बेस, जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार, आमदार सुभाष झांबड, केशवराव औताडे, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, शहराध्यक्ष नामदेव पवार, विलास औताडे, माजी आमदार नितीन पाटील यांच्यासह अनेक ज्येष्ठ मंडळींची फौज त्यांच्या ताफ्यात आहे. केंद्र व राज्य सरकार गेल्या तीन वर्षांत सर्व पातळ्यांवर कसे अपयशी ठरले आहे, यावरून जोरदार प्रचार झाला. शेतकरी आत्महत्या, नापिकी, नोटबंदी, इंधनाचा वाढते दर, महागाई, लोडशेडिंग या मुद्यांवरून काँग्रेसने रान उठवले, पण त्याचा मतदानावर फारसा प्रभाव पडला नसल्याचे चित्र आहे. सरपंचपदाची निवडणूक पक्षचिन्हावर नसल्याने भाजप, शिवसेना आणि काँग्रेसने आपापल्या सर्वाधिक जागा निवडून आल्याचा दावा केला आहे.

‘औरंगाबादकडे लक्ष द्यावे’
सत्ता गमाविल्यानंतर काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. राज्यातील नेत्यांनी आत्मविश्वास वाढीस लागण्यासाठी जिल्ह्यात येऊन बैठका घेणे आवश्यक होते. ते आतापर्यंत झाले नाही. या निवडणुकीनंतर काँग्रेसच्या दाव्याप्रमाणे जर त्यांना चांगले यश मिळाले असेल, तर काँग्रेस श्रेष्ठींनी औरंगाबादकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत काँग्रेस नेते खाजगीत बोलताना व्यक्त करत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज