औरंगाबाद : महावितरणकडून वीज बिल शून्य थकबाकीची मोहीम राबविण्यात येत आहे. वसुलीसाठी थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. वीज ग्राहकांना सुटीच्या दिवशीही बिलाचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी महावितरण प्रादेशिक विभागाच्या औरंगाबाद, जळगाव, लातूर व नांदेड परिमंडळ कार्यालयांतर्गत महावितरणचे वीज बिल भरणा केंद्र २९ व ३० मार्च रोजी सुटीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती महावितरण कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.
वीज बिल भरणा केंद्र सुटीच्या दिवशीही सुरू
महावितरणकडून वीज बिल शून्य थकबाकीची मोहीम राबविण्यात येत आहे वसुलीसाठी थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे...
Maharashtra Times 27 Mar 2018, 5:00 am