औरंगाबाद : शहरातील खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी औरंगाबादमध्ये क्रीडा विद्यापीठ स्थापन करा, अशी मागणी आमदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. औरंगाबादमध्ये साई क्रीडा मंडळासह सिडकोचे क्रिकेट मैदान आणि इतर खेळांची मैदाने आहेत. शहरातील अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावर आपली छाप पाडली आहे. औरंगाबादला विधी विद्यापीठ सुरू करण्यात आले. त्याप्रमाणेच क्रीडा विद्यापीठ स्थापन करावे. त्यामुळे मराठवाड्यातील विद्यार्थी आणि खेळाडूंना विविध क्रीडा प्रकारात आपले भविष्य घडविण्याची संधी मिळे, असे साकडे जलील यांनी मुख्यमंत्र्यांना घातले आहे.
औरंगाबादमध्ये क्रीडा विद्यापीठ स्थापन करा
शहरातील खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी औरंगाबादमध्ये क्रीडा विद्यापीठ स्थापन करा, अशी मागणी आमदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...
Maharashtra Times 5 Jul 2018, 4:00 am