अ‍ॅपशहर

समृद्धीः मोबदल्यासाठी शेतकऱ्यानं केला आत्मदहनाचा प्रयत्न

समृद्धी महामार्गातील भूसंपादन प्रक्रिया अद्यापही वादात असल्याचं दिसून येत आहे. संपादित जमिनीचा मोबदला लवकरात लवकर मिळावा, यासाठी एका शेतकऱ्यानं औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आत्मदहनाचा प्रयत्न केला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Dec 2018, 5:11 pm
औरंगाबाद:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Atmdahan


समृद्धी महामार्गातील भूसंपादन प्रक्रिया अद्यापही वादात असल्याचं दिसून येत आहे. संपादित जमिनीचा मोबदला लवकरात लवकर मिळावा, यासाठी एका शेतकऱ्यानं औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आत्मदहनाचा प्रयत्न केला.

स्वरुपचंद खोलवाल असं या शेतकऱ्याचं नाव आहे. या शेतकऱ्याची ४० गुंठे जमीन पळशी गावात असून, या सर्व जमिनीचे संपादन झाले आहे. मात्र, धनादेश दुसऱ्याच्या नावाने काढण्यात आला आहे, असा दावा खोलवाल यांनी केला आहे. या जमिनीवर सध्या खोलवाल यांचा ताबा आहे. हे प्रकरण न्यायालयात आहे, असं उपविभागीय अधिकाऱ्यानं सांगितलं. मुंबई आणि नागपूरला जोडणारा समृद्धी महामार्ग हा सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, भूसंपादनाचा वाद कायम असल्याचं दिसून येत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज