अ‍ॅपशहर

‘शेतकरी अडचणीत, पण सरकार गंभीर नाही’

आधीच करोना संसर्गाचे संकट, त्यात अतिवृष्टीमुळे हाताचे आलेले पीक वाया गेले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. (pravin darekar criticized state government farmers issue )

महाराष्ट्र टाइम्स 2 Oct 2020, 3:57 pm
औरंगाबाद : आधीच करोना संसर्गाचे संकट, त्यात अतिवृष्टीमुळे हाताचे आलेले पीक वाया गेले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यांना तातडीने मदत करणे गरजेचे आहे, पण राज्यातील आघाडी सरकार याबाबत गंभीर नाही, असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी गुरुवारी (एक ऑक्टोबर) येथे केला. पंचनाम्याचा खेळ न चालविता राज्य सरकारने नुकसानीचा छायाचित्रे ग्राह्य धरावीत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने ओला दुष्काळ जाहीर करत हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ‘शेतकरी अडचणीत, पण सरकार गंभीर नाही’


मराठवाड्यातील नुकसानीची पाहणी व आढावा घेण्यासाठी दरेकर गुरुवारी सायंकाळी औरंगाबादेत दाखल झाले त्याप्रसंगी सुभेदारी विश्रामगृह येथे ते 'मटा'शी बोलत होते. मराठवाड्यात यावर्षी चांगला पाऊस झाला धरणे भरली एकीकडे हे सुखद चित्र असतानाच झालेल्या अतिवृष्टीमुळे हाताचे पीक वाया गेल्याचे पाहण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे पंचनाम्याचे खेळ न मांडता मुख्यमंत्र्यांनी तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज