म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद:
शेतकाऱ्यांशी सहवेदना व्यक्त करण्यासाठी १९ मार्च रोजी शहरात ठिकठिकाणी उपोषण करण्याचा निर्धार किसानपुत्रांनी व्यक्त केला आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या आवारात अमर हबीब यांच्या प्रमुख उपस्थितीत किसानपुत्र संघटनेची नुकतीच बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.
शेतकऱ्यांसोबत आता किसानपुत्रांच्याही आत्महत्यांचे सत्र सुरू झाल्या आहेत. या बाबत या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. भावनिक मुद्दे उपस्थित करून किसानपुत्राना भ्रमित केले जात आहे. हे ओळखून किसानपुत्रांनी मूळ मुद्द्यावरून लक्ष विचलित होऊ देऊ नये व शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्यासाठी लढा तीव्र करावा, असे आवाहन यावेळी अमर हबीब यांनी केले. किसानपुत्र आंदोलनाचे स्थानिक समन्वयक अॅड. भूषण पाटील म्हणाले की, १९ मार्च १९८६ रोजी शेतकरी साहेबराव करपे यांच्या पूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली. त्या घटनेचे स्मरण करून आत्महत्या केलेल्या सर्व शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी १९ मार्च रोजी हा उपवास करायचा आहे, असे त्यांनी नमूद केले. हा कार्यक्रम कोण्या पक्षाचा किंवा संघटनेचा नसून त्यात सर्वजण सहभागी होऊ शकतात, असे आवाहनही त्यांनी केले.
शेतकाऱ्यांशी सहवेदना व्यक्त करण्यासाठी १९ मार्च रोजी शहरात ठिकठिकाणी उपोषण करण्याचा निर्धार किसानपुत्रांनी व्यक्त केला आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या आवारात अमर हबीब यांच्या प्रमुख उपस्थितीत किसानपुत्र संघटनेची नुकतीच बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.
शेतकऱ्यांसोबत आता किसानपुत्रांच्याही आत्महत्यांचे सत्र सुरू झाल्या आहेत. या बाबत या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. भावनिक मुद्दे उपस्थित करून किसानपुत्राना भ्रमित केले जात आहे. हे ओळखून किसानपुत्रांनी मूळ मुद्द्यावरून लक्ष विचलित होऊ देऊ नये व शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्यासाठी लढा तीव्र करावा, असे आवाहन यावेळी अमर हबीब यांनी केले. किसानपुत्र आंदोलनाचे स्थानिक समन्वयक अॅड. भूषण पाटील म्हणाले की, १९ मार्च १९८६ रोजी शेतकरी साहेबराव करपे यांच्या पूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली. त्या घटनेचे स्मरण करून आत्महत्या केलेल्या सर्व शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी १९ मार्च रोजी हा उपवास करायचा आहे, असे त्यांनी नमूद केले. हा कार्यक्रम कोण्या पक्षाचा किंवा संघटनेचा नसून त्यात सर्वजण सहभागी होऊ शकतात, असे आवाहनही त्यांनी केले.