अ‍ॅपशहर

शेतवस्तीवरील संसार खाक

म टा प्रतिनिधी, कन्नड तालुक्यातील आंबा या गावातील सदू कान्हीराम जाधव यांच्या शेतवस्तीवरील घरास दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी आग लागली...

Maharashtra Times 12 Nov 2018, 4:00 am

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

तालुक्यातील आंबा या गावातील सदू कान्हीराम जाधव यांच्या शेतवस्तीवरील घरास दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी आग लागली. या आगीत सुमारे अडीच लाख रुपयांचे संसारोपयोगी व शेती साहित्य जळून खाक झाले.

आंबा गावाच्या शिवारातील फैशुबा परिसरातील गट क्रमांक १५ मधील सदू कान्हीराम जाधव यांच्या शेतवस्तीवरील घरास गुरुवारी (८ नोव्हेंबर) सकाळी अचानक आग लागली. या आगीत घरातील कापूस, हरभरा या शेतमालासह घरातील भांडी, संसार उपयोगी साहित्य, ठिबक नळ्या, पीव्हीसी पाइप, गुरांचा चारा, शेतातील पिकांवर फवारणी औषधी, खते, घरावरील पत्रे असे एकूण दोन लाख ५१ हजारांचे साहित्य जळून खाक झाले. शेजारील शेतकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. हा घटना सकाळी झाल्या मुळे व प्रसंगावधान राखल्याने जीवितहानी टळली. महसूल विभागाने या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून हे शेतकरी कुटूंब उघड्यावर पडले आहे. या घरात लहान मोठे मिळून एकूण दहा सदस्य आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज