अ‍ॅपशहर

कृषी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाची परीक्षा सुरू

म टा प्रतिनिधी, औरंगाबादकृषी विद्यापीठांनी आपल्या अंतिम वर्ष अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Jun 2020, 4:00 am

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कृषी विद्यापीठांनी आपल्या अंतिम वर्ष अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. करोना विषाणू संसर्ग लक्षात घेत विद्यापीठ आणि महाविद्यालयस्तरावरील अंतर्गत व बाह्य प्रक्रिया पूर्णपणे 'ऑनलाइन' करून परीक्षेचा प्रश्न सोडविला आहे.

पारंपरिक विद्यापीठांच्या अंतिम वर्ष परीक्षेचा प्रश्न कायम आहे. कृषी विद्यापीठांनी मात्र अंतिम वर्षासाठी असणारी प्रात्यक्षित प्रकल्पाची प्रक्रिया 'ऑनलाइन' पद्धतीने पूर्ण करत अंतिम वर्ष परीक्षेचा तिढा सोडविला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांमधील अंतिम वर्षाच्या परीक्षांची प्रक्रिया 'ऑनलाइन' पूर्ण करण्याकडे पाऊल टाकले आहे. या विद्यापीठांतर्गत सात कृषी पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो. यामध्ये बीएससी कृषी, अन्न व तंत्रज्ञान आदी अभ्यासक्रमांचा समावेश आहे. त्यांच्या अभ्यासक्रमांचा शेवटच्या वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षा नसते. या विद्यार्थ्यांना एखाद्या प्रकल्पावर काम करावे लागते. प्रत्यक्ष कंपनीत जाऊन, 'फिल्ड'वर जाऊन हा प्रकल्प पूर्ण करावा लागतो. त्यानंतर त्याचा प्रकल्प अहवाल महाविद्यालयाला सादर केला जातो. महाविद्यालयीन स्तरावर त्याच्या प्रकल्पाची तपासणी, मुलाखत अशी प्रक्रिया पार पडते. विद्यापीठाने नियुक्त केलेल्या तज्ज्ञा समोरही या विद्यार्थ्याला सादरीकरण करावे लागते. त्यानंतर त्याला गुण दिले जातात. 'करोना'मुळे प्रत्यक्ष राहून विद्यार्थ्यांना ही प्रक्रिया करणे अशक्य असल्याने विद्यापीठाने ही प्रक्रिया दोन्ही स्तरावर 'ऑनलाइन' घेण्यास परवानगी दिली. त्यामुळे अंतिम वर्ष परीक्षेचा प्रश्न सुटला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज