म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल सावे यांच्या तर्फे पाच हजार गरजूंना अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले. याप्रसंगी संघटन मंत्री भाऊराव देशमुख, खासदार डॉ. भागवत कराड, शहराध्यक्ष संजय केणेकर, प्रदेश प्रवक्ते शिरीश बोराळकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य अनिल मकरिये, बसवराज मंगरुळे, भगवान घडमोडे, प्रशांत देसरडा, कचरू घोडके, गोविंद केंद्रे, शिवाजी दांडगे, गणेश नावंदर, अरुण पालवे, लक्ष्मीकांत थेटे, बालाजी मुंडे, राहुल खरात, नितीन खरात, रामेश्वर दसपुते, राजेश मेहता, शाहू पाटनी, अशोक गोरे आदींची उपस्थिती होती.