अ‍ॅपशहर

स्कॉर्पिओने ६ जणांना चिरडले; ४ ठार, २ जखमी

औरंगाबाद-जालना रोडवर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या सहा जणांना भरधाव आलेल्या स्कॉर्पिओ गाडीनं चिरडल्याची घटना आज सकाळी घडली. जालना रोडवरील केंब्रिजशाळेजवळ सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून यात चार जणांचा मृत्यू झाला आहे.

Maharashtra Times 16 Sep 2017, 12:13 pm
मटा ऑनलाइन वृत्त । औरंगाबाद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम four people killed road accident in near aurangabad
स्कॉर्पिओने ६ जणांना चिरडले; ४ ठार, २ जखमी


औरंगाबाद-जालना रोडवर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या सहा जणांना भरधाव आलेल्या स्कॉर्पिओ गाडीनं चिरडल्याची घटना आज सकाळी घडली. जालना रोडवरील केंब्रिज शाळेजवळ सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्कॉर्पिओचा चालक फरार झाला आहे.

औरंगाबाद-जालना रोडवर नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या सहा जणांना भरधाव स्कॉर्पिओ गाडीनं चिरडले. या अपघातात भागिनाथ लिंबाजी गवळी (वय ५६), नारायण गंगाराम वाघमारे (वय ६५), दगडूजी बालाजी ढवळे (वय ६५) आणि अनिल विठ्ठल सोनावणे (वय ४५) यांचा मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत, हे सर्व जण चिकलठाण्यातील हनुमान चौकात राहणारे आहेत. भरधाव आलेल्या स्कॉर्पिओने जोरदार धडक दिल्यानं चार जणांचा यात मृत्यू झाला. गाडी चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपघातानंतर गाडी रस्त्यांच्या बाजुला असलेल्या खड्यात पडली. अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून फरार झालेल्या स्कॉर्पिओ चालकाचा शोध घेत आहेत. दरम्यान, भरधाव आलेल्या स्कॉर्पिओने या चार जणांना चिरडल्याचे प्रत्यक्षदर्शिनं सांगितलं असून गाडी सोडून चालक फरार झाला आहे. गाडीचा नंबर एमएच-२७-एव्ही-५२८२ असून ही गाडी अमरावतीची असल्याची माहिती मिळत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज