औरंगाबाद: शहरात कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी चिकलठाण, हर्सूल, पडेगाव, कांचनवाडी येथे प्रक्रिया केंद्र उभारण्यात आले. या केंद्रावर सोमवारपासून प्रक्रियेसाठी कचरा नेण्यात येणार आहे. कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी सनियंत्रण समितीने प्रक्रिया केंद्र उभारण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार हे केंद्र उभारण्यात आले. येथे कंम्पोस्टिंग शेड उभारण्याचे काम पूर्ण झाले. तेथे कचरा नेऊन त्यावर तेथे प्रक्रिया केली जाणार आहे. त्यासाठी वॉर्ड अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आला आहे. शहरातील चार प्रभागातील आणि रस्त्यावर पडलेला कचरा या चार ठिकाणी नेण्यात येणार आहे.
प्रक्रिया केंद्रात कचरा नेणार आजपासून
शहरात कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी चिकलठाण, हर्सूल, पडेगाव, कांचनवाडी येथे प्रक्रिया केंद्र उभारण्यात आले...
Maharashtra Times 14 May 2018, 4:00 am