म. टा. प्रतिनिधी, कन्नड
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत नगरपालिकेच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण नुकतेच देण्यात आले. पहिल्या टप्प्यात शालेय विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांसाठी, तर दुसऱ्या टप्प्यात महिलांनी प्रशिक्षण घेतले.
या कार्यशाळेत औरंगाबाद येथील राजा रवी वर्मा चित्रकला महाविद्यालयाचे महेंद्र खाजेकर, शालबी दंडे, स्वाती दाभाडे, सिद्धांत साळवे, वैशाली धोत्रे, हरिदास दागोंडे यांनी प्रशिक्षण दिले. 'पीओपी'च्या मूर्तीमुळे पाण्याचे प्रदूषण होते, त्यामुळे शाडू मातीच्या गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. या मूर्तीचे विसर्जन घरी करता येते व त्या मातीचा पुनर्वापर करता येतो,' असे नगराध्यक्षा स्वाती कोल्हे यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याधिकारी नंदा गायकवाड, व उपमुख्याधिकारी बी. एस. साळवे, यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा घेण्यात आली.