अ‍ॅपशहर

महाराष्ट्राला हादरवणारी घटना, औरंगाबादमध्ये अल्पवयीन मुलीवर सहा नराधमांचा बलात्कार

Maharashtra News : पंतप्रधान मोदी यांनी आज स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशाला संबोधित करत महिलांचा सन्मान करण्याचा संदेश दिला. महिलांच्या बाबतीत वर्तणूक सुधारण्याचं आवाहन केलं. महिलांवरील अत्याचार रोखण्याचं आवाहन केलं. दुसरीकडे मात्र महाराष्ट्रात धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीवर सहा जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. ही घटना औरंगाबाद जिल्ह्यात घडली आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Aug 2022, 4:13 pm
औरंगाबाद : एकिकडे देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करत असताना महाराष्ट्राला ( Aurangabad News Today ) हदरावणारी घटना समोर आली आहे. घरची परिस्थिती प्रतिकुल असल्याने शेतात मजुरीला जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवत गावातीलच सहा नराधमानी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी सर्व आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rape on minor girl
महाराष्ट्राला हादरवणारी घटना, औरंगाबादमध्ये अल्पवयीन मुलीवर सहा नराधमांचा बलात्कार ( प्रातिनिधिक फोटो )


पीडित अल्पवयीन मुलीच्या घरची परिस्थिती प्रतिकूल असल्याने ती गावातीलच शेतात मजुरी करते. आज दुपारी ती शेतात जात असताना सहा आरोपींनी तिला रस्त्यात अडवलं आणि निर्जनस्थळीनेत आळीपाळीने पीडितेवर अत्याचार केला. यानंतर आरोपी पीडितेला सोडून तिथून पसार झाले. भेदरलेल्या पीडितेला वेदना असह्य होत असल्याने तीने घर गाठत घडलेला प्रसंग आईला सांगितला. आईने क्षणाचाही विलंब नं करता पीडितेला सोबत घेत कन्नड ग्रामीण पोलीस ठाणे गाठत फिर्याद नोंदविली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

लग्नाच्या वाढदिवसाला पतीने दिलं भयंकर गिफ्ट, फिरायला जायला बायको नाही म्हणाली

औरंगाबादमध्ये जे शिवसेनेतून फुटलेत, त्यांना आम्ही दोघं आडवं करू; खैरे-दानवेंचा हल्लाबोल

सामूहिक बलात्कार प्रकरणी पोलिसांनी सर्व सहा आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यातील एक आरोपी हा अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. यातील काही आरोपींनी यापूर्वी देखील पीडितेची छेड काढत अत्याचार केले होते. मात्र, पीडितेने भीतीने ही बाब कुणालाही संगितली नव्हती. मात्र सहा नराधमाच्या अत्याचारानंतर असह्य वेदनेमुळे तिने हिंमत करत आईल घडलेला प्रकार सांगितला आणि हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास औरंगाबाद ग्रामीण पोलीस करत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज