म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ज्याच्याशी लग्न ठरले होते त्यानेच तरुणीची पर्स पळवून साडेतेरा हजारांचा गंडा घातल्याप्रकरणी आरोपी मनोज मदन इंगळे याचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. ए. पाटील यांनी बुधवारी (१८ जुलै) फेटाळला.
या प्रकरणी माधुरी अर्जून जाधव (२१, रा. कुंभेफळ, ता. जि. औरंगाबाद) हिने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, आरोपी मनोज मदन इंगळे (३३, रा. जुना जालना) याच्याशी फिर्यादीचे लग्न ठरले होते व ते एकमेकांना फोनवर बोलत होते, भेटत होते. दरम्यान, आरोपीचे दुसऱ्या तरुणीशी लग्न ठरल्याचे कळाल्यावर फिर्यादीने आरोपीला जाब विचारला. त्यावेळी आरोपीने फिर्यादीला शेकटा येथील दर्ग्याच्या ठिकाणी बोलावले. त्यावेळी आरोपीने तिच्याशी गप्पा मारल्या आणि त्याचवेळी आरोपीने तिला उद आणण्यास सांगितले आणि तेवढ्यात आरोपीने तिची पर्स पळवली. पर्समध्ये मोबाईल व साडेचार हजार रुपये रोख, असा १३,५०० रुपयांचा ऐवज होता. या प्रकरणी फिर्यादीने तक्रार दिल्यावरुन कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या प्रकरणात आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात अर्ज सादर केला होता. त्या अर्जावरील सुनावणीवेळी, आरोपीकडून ऐवज जप्त करणे बाकी असून, तपासासाठी आरोपीच्या अटकेची गरज असल्याने आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करू नये, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील राजू पहाडिया यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.
ज्याच्याशी लग्न ठरले होते त्यानेच तरुणीची पर्स पळवून साडेतेरा हजारांचा गंडा घातल्याप्रकरणी आरोपी मनोज मदन इंगळे याचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. ए. पाटील यांनी बुधवारी (१८ जुलै) फेटाळला.
या प्रकरणी माधुरी अर्जून जाधव (२१, रा. कुंभेफळ, ता. जि. औरंगाबाद) हिने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, आरोपी मनोज मदन इंगळे (३३, रा. जुना जालना) याच्याशी फिर्यादीचे लग्न ठरले होते व ते एकमेकांना फोनवर बोलत होते, भेटत होते. दरम्यान, आरोपीचे दुसऱ्या तरुणीशी लग्न ठरल्याचे कळाल्यावर फिर्यादीने आरोपीला जाब विचारला. त्यावेळी आरोपीने फिर्यादीला शेकटा येथील दर्ग्याच्या ठिकाणी बोलावले. त्यावेळी आरोपीने तिच्याशी गप्पा मारल्या आणि त्याचवेळी आरोपीने तिला उद आणण्यास सांगितले आणि तेवढ्यात आरोपीने तिची पर्स पळवली. पर्समध्ये मोबाईल व साडेचार हजार रुपये रोख, असा १३,५०० रुपयांचा ऐवज होता. या प्रकरणी फिर्यादीने तक्रार दिल्यावरुन कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या प्रकरणात आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात अर्ज सादर केला होता. त्या अर्जावरील सुनावणीवेळी, आरोपीकडून ऐवज जप्त करणे बाकी असून, तपासासाठी आरोपीच्या अटकेची गरज असल्याने आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करू नये, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील राजू पहाडिया यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.