अ‍ॅपशहर

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'गुड न्यूज'; महामंडळाने घेतला 'हा' महत्वाचा निर्णय

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या परीक्षांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Maharashtra Times 3 Jan 2022, 9:34 am
औरंगाबाद : दहावी, बारावीच्या २०२२ मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना आता नियमित शुल्कासह परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंत अर्ज भरता येणार आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या परीक्षांसाठी अर्ज भरण्यासाठी आकारण्यात येणारे विलंब शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम students news


माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी, बारावी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. नियमित शुल्कासह अर्ज भरल्यानंतर विलंब शुल्कासह विद्यार्थ्यांना अर्ज भरावा लागतो. त्यात विलंब शुल्काचेही टप्पे असतात, अनेकदा हा विलंब शुल्क हजाराच्या घरात जातो. त्यामुळे काही विद्यार्थी परीक्षेला नोंदणी करत नाहीत. यंदा मंडळाने विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंत नियमित शुल्कासह परीक्षेसाठी अर्ज भरता येईल असे स्पष्ट केले आहे.

लाल परीची चाकं अखेर फिरली, एका दिवसांत तब्बल ८ हजार प्रवाशांनी केला प्रवास
याबाबत मंडळाने शाळा, कॉलेजांना पत्र पाठविले आहे. ज्यात मंडळाने म्हटले आहे की, दहावीच्या परीक्षेसाठी २७ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत व बारावीसाठी १९ डिसेंबर ते २८ डिसेंबरपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज भरण्याबाबत तारखा मंडळाकडून जाहीर करण्यात आल्या होत्या. या दरम्यान विलंब शुल्क आकरण्यात येऊ नये, विलंब शुल्क माफ करण्यात यावे. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंत ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा देण्यात यावी असे शासनाने निर्देश दिले. त्या अनुषंगाने मार्च-एप्रिल २०२२ वर्षासाठी विलंब शुल्क माफ करण्यात आले. त्यासह परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंत विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह अर्ज भरता येणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज