औरंगाबाद : केरळ येथील पूरग्रस्तांसाठी मिलिंद विज्ञान कॉलेजच्या 'एनएसएस'च्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला असून, त्यांनी शुक्रवारी शहरातून मदतफेरी काढत निधी संकलन केले. कॉलेज परिसरातून या फेरीला सुरुवात झाली. छावणी व नंदनवन परिसरातून ही फेरी काढण्यात आली. नागरिकांनी सामाजिक दायित्व दाखवत सढळ हाताने मदत केली. फेरीतून आठ हजार १६८ रुपयांचा निधी संकलित झाला असून, ही रक्कम केरळ सरकारला सुपुर्द करण्यात येणार आहे. प्राचार्य डॉ. एस. डी. राठोड, कार्यक्रम अधिकारी डॉ. आर. ए. वाघमारे, डॉ. के. एन. विधाटे, डॉ. एम. पी. कुलथे, डॉ. आर. एस. यन्नावर, डॉ. एस. डी. सरकटे, डॉ. ए. एस. मुंडे आदी यावेळी उपस्थित होते.
केरळसाठी मदत फेरी
केरळ येथील पूरग्रस्तांसाठी मिलिंद विज्ञान कॉलेजच्या 'एनएसएस'च्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला असून, त्यांनी शुक्रवारी शहरातून मदतफेरी काढत निधी ...
Maharashtra Times 2 Sep 2018, 4:00 am