अ‍ॅपशहर

पत्नीच्या विरहाने पतीची आत्महत्या

फोटो आहेपत्नीच्या विरहाने पतीची आत्महत्याउस्मानपुरा येथील घटनाम टा...

Maharashtra Times 22 Jan 2018, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sucide

पत्नी माहेरी राहत असल्याने तिच्या विरहात पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सायंकाळी उस्मानपुरा, फुलेनगर भागात उघडकीस आली. आशिष दिलीप निकम (वय २४), मृताचे नाव असून उस्मानपुरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
आशीष हा फुलेनगर भागात आई व वडिलांसह राहत होता. त्याची आई शनिवारी सायंकाळी घराबाहेर भांडे घासत होती, तर वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. यावेळी आशिषचे मेहुणे उमेश साळवे हे घरी आले. त्यांनी आशिषला आवाज दिला असता त्याच्या खोलीतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी खोलीत जाऊन पाहिले असता आशिषने छताच्या हुकाला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. आशिषला हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. आशिष आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद असल्याने दोन वर्षांपासून त्याची पत्नी माहेरी राहत होती. यामुळे तो तणावात होता, अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज