म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबादकरांच्या जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या जालना रस्त्याचे ग्रहण काही केल्या सुटत नाही असे चित्र कायम आहे. सर्वाधिक रहदारीच्या या रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर उपाय काढण्यासाठी प्रस्तावित केलेल्या चिकलठाणा विमानतळासमोरील उड्डाणपुलाची मंजुरी जवळपास रद्द झाल्यात जमा आहे. राजकीय चढाओढीपोटी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) मंजूर केलेला हा उड्डाणपूल रद्द झाला तर, वाहतूक कोंडीची डोकेदुखी कायम राहणार आहे.
जालना रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी एकात्मिक रस्ते विकास योजनेतून (आयआरडीपी) महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) वतीने जालना रस्त्यावर पाच उड्डाणपूल बांधले. दरम्यान, जालना रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी एनएचएआयने ७३ कोटी रुपये मंजूर केले. हैदराबादच्या सृष्टी काँटेक प्रायव्हेट लिमिटेडला काम मिळाले. जालना रस्त्याचे मजबुतीकरण, दोन्ही बाजूंनी आरसीसी ड्रेन, पेव्हर ब्लॉक, तीन फूट ओव्हर ब्रीज आणि चिकलठाणा विमानतळासमोर उड्डाणपूल प्रस्तावित होता.
उड्डाणपूल वगळता सर्व कामे जवळपास अंतिम टप्प्यात आहेत. जून महिन्यात पुलाची उभारणी सुरु होणार होती. पुलाचे बांधकाम करताना वाहतुकीस अडथळा येऊ नये, यासाठी दोन्ही बाजूंनी सर्व्हिस रोडही बनविले गेले. मात्र, त्याच वेळी कामासाठी अडथळा निर्माण झाला. जालना रोडवर अखंड उड्डाणपूल उभारणीस केंद्रीयमंत्री नितीन गडकरी अनुकूल आहेत, असे सांगण्यात आले आणि नवीन प्रस्तावित उड्डाणपुलासाठी डीपीआर नेमण्याच्या प्रस्तावाची तयारी केली गेली. सहा महिने उलटून गेले तरी याबाबत काहीच प्रगती नाही. शहरात आहे त्या पुलांची जबाबदारी कोणत्या यंत्रणेकडे याबाबत ठोस माहिती नसताना नव्या उड्डाणपुलासाठी सुरु झालेली राजकीय श्रेयवादाची लढाई विमानतळासमोरील उड्डाणपुलासमोर अडचणीची ठरली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा उड्डाणपूल रद्द होण्याची शक्यता आहे. अखंड उड्डाणपुलासाठी डीपीआर एजन्सी नेमण्याबाबतचा प्रस्ताव स्थानिक एनएचएआय कार्यालयातून नागपूर मुख्यालयात पाठविला आहे. तेथून तो दिल्लीला सरकला की नाही याची माहिती नाही. नवीन पुलाबाबत निर्णय होईल की नाही याबाबतही शाश्वती नाही. यामुळे मंजूर झालेल्या उड्डाणपुलाच्या उभारणीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, जर चिकलठाणा विमानतळासमोरील उड्डाणपूल रद्द झाला तर, त्या परिसरातील वाहतूक कोंडी कायम राहणार आहे. अखंड उड्डाणपुलाचा प्रस्ताव मंजूर होणे तूर्तास तरी अवघड आहे. अशा परिस्थितीत शहराच्या विकासात अडथळा आणल्याबद्दल कोणाला जबाबदार धरायचे, असा सवाल आता उपस्थित होणार आहे.
औरंगाबादकरांच्या जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या जालना रस्त्याचे ग्रहण काही केल्या सुटत नाही असे चित्र कायम आहे. सर्वाधिक रहदारीच्या या रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर उपाय काढण्यासाठी प्रस्तावित केलेल्या चिकलठाणा विमानतळासमोरील उड्डाणपुलाची मंजुरी जवळपास रद्द झाल्यात जमा आहे. राजकीय चढाओढीपोटी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) मंजूर केलेला हा उड्डाणपूल रद्द झाला तर, वाहतूक कोंडीची डोकेदुखी कायम राहणार आहे.
जालना रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी एकात्मिक रस्ते विकास योजनेतून (आयआरडीपी) महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) वतीने जालना रस्त्यावर पाच उड्डाणपूल बांधले. दरम्यान, जालना रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी एनएचएआयने ७३ कोटी रुपये मंजूर केले. हैदराबादच्या सृष्टी काँटेक प्रायव्हेट लिमिटेडला काम मिळाले. जालना रस्त्याचे मजबुतीकरण, दोन्ही बाजूंनी आरसीसी ड्रेन, पेव्हर ब्लॉक, तीन फूट ओव्हर ब्रीज आणि चिकलठाणा विमानतळासमोर उड्डाणपूल प्रस्तावित होता.
उड्डाणपूल वगळता सर्व कामे जवळपास अंतिम टप्प्यात आहेत. जून महिन्यात पुलाची उभारणी सुरु होणार होती. पुलाचे बांधकाम करताना वाहतुकीस अडथळा येऊ नये, यासाठी दोन्ही बाजूंनी सर्व्हिस रोडही बनविले गेले. मात्र, त्याच वेळी कामासाठी अडथळा निर्माण झाला. जालना रोडवर अखंड उड्डाणपूल उभारणीस केंद्रीयमंत्री नितीन गडकरी अनुकूल आहेत, असे सांगण्यात आले आणि नवीन प्रस्तावित उड्डाणपुलासाठी डीपीआर नेमण्याच्या प्रस्तावाची तयारी केली गेली. सहा महिने उलटून गेले तरी याबाबत काहीच प्रगती नाही. शहरात आहे त्या पुलांची जबाबदारी कोणत्या यंत्रणेकडे याबाबत ठोस माहिती नसताना नव्या उड्डाणपुलासाठी सुरु झालेली राजकीय श्रेयवादाची लढाई विमानतळासमोरील उड्डाणपुलासमोर अडचणीची ठरली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा उड्डाणपूल रद्द होण्याची शक्यता आहे. अखंड उड्डाणपुलासाठी डीपीआर एजन्सी नेमण्याबाबतचा प्रस्ताव स्थानिक एनएचएआय कार्यालयातून नागपूर मुख्यालयात पाठविला आहे. तेथून तो दिल्लीला सरकला की नाही याची माहिती नाही. नवीन पुलाबाबत निर्णय होईल की नाही याबाबतही शाश्वती नाही. यामुळे मंजूर झालेल्या उड्डाणपुलाच्या उभारणीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, जर चिकलठाणा विमानतळासमोरील उड्डाणपूल रद्द झाला तर, त्या परिसरातील वाहतूक कोंडी कायम राहणार आहे. अखंड उड्डाणपुलाचा प्रस्ताव मंजूर होणे तूर्तास तरी अवघड आहे. अशा परिस्थितीत शहराच्या विकासात अडथळा आणल्याबद्दल कोणाला जबाबदार धरायचे, असा सवाल आता उपस्थित होणार आहे.