म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पिकअप जीपमधून आठ बैल तसेच दोन गायींची अवैध वाहतूक करणाऱ्या तिघा आरोपींचा नियमित अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन यांनी फेटाळला.
छावणी पोलिस गस्त घालत असताना ७ जानेवारी २०१८ रोजी पडेगाव रोडवर पिकअप जीपमधून जनावरांची अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याचे आढळळे. जीप अडवून तपासणी केली असता, त्यात ८ बैल व २ गायी आढळून आल्या. या प्रकरणी जीपमधील संशयित आरोपी मोहम्मद शफिक मोहम्मद रफिकोद्दीन (वय ३२, रा. समतानगर), शेख आरीफ राजमोहम्मद (वय ४०, रा. पडेगाव) व मोहम्मद आसिफ सलीम कुरेशी (वय २७, रा. सिल्लेखाना) यांना अटक करुन त्यांच्याविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना कोर्टात हजर करण्यात आले असता, त्यांची रवानगी आधी पोलिस कोठडीत व नंतर न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. दरम्यान, तिन्ही आरोपींनी नियमित जामिनासाठी कोर्टात अर्ज सादर केला होता. सुनावणीवेळी, आरोपींनी या प्रकारचे किती गुन्हे केले आहेत, याचा तपास करणे बाकी असून प्रकरण संवेदनशील आहे आणि तपास प्राथमिक अवस्थेत आहे. त्यामुळे आरोपींना नियमित जामीन मंजूर करु नये, अशी विनंती जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने तिन्ही आरोपींचा नियमित जामीन फेटाळला. जिल्हा सरकारी वकील देशपांडे यांना सिद्धार्थ वाघ यांनी सहकार्य केले.
पिकअप जीपमधून आठ बैल तसेच दोन गायींची अवैध वाहतूक करणाऱ्या तिघा आरोपींचा नियमित अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन यांनी फेटाळला.
छावणी पोलिस गस्त घालत असताना ७ जानेवारी २०१८ रोजी पडेगाव रोडवर पिकअप जीपमधून जनावरांची अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याचे आढळळे. जीप अडवून तपासणी केली असता, त्यात ८ बैल व २ गायी आढळून आल्या. या प्रकरणी जीपमधील संशयित आरोपी मोहम्मद शफिक मोहम्मद रफिकोद्दीन (वय ३२, रा. समतानगर), शेख आरीफ राजमोहम्मद (वय ४०, रा. पडेगाव) व मोहम्मद आसिफ सलीम कुरेशी (वय २७, रा. सिल्लेखाना) यांना अटक करुन त्यांच्याविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना कोर्टात हजर करण्यात आले असता, त्यांची रवानगी आधी पोलिस कोठडीत व नंतर न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. दरम्यान, तिन्ही आरोपींनी नियमित जामिनासाठी कोर्टात अर्ज सादर केला होता. सुनावणीवेळी, आरोपींनी या प्रकारचे किती गुन्हे केले आहेत, याचा तपास करणे बाकी असून प्रकरण संवेदनशील आहे आणि तपास प्राथमिक अवस्थेत आहे. त्यामुळे आरोपींना नियमित जामीन मंजूर करु नये, अशी विनंती जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने तिन्ही आरोपींचा नियमित जामीन फेटाळला. जिल्हा सरकारी वकील देशपांडे यांना सिद्धार्थ वाघ यांनी सहकार्य केले.