औरंगाबाद : चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांना पावासासोबत महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका बसला. चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील दोन फिडरचा वीज पुरवठा खंडित झाला होता. यामुळे या भागातील वीज पुरवठा सकाळी चार आणि सायंकाळी अडीच तासांसाठी बंद होता. चिकलठाणा औद्योगिक वसाहतीचे फिडर जुने झाले असून विद्युत वितरण यंत्रणाही नाजूक आहे. वाऱ्याचा वेग वाढला की अनेकदा येथील वीज गुल होत असल्याच्या तक्रारी सुरू आहेत. या परिसरातील मान्सूनपूर्व दुरुस्त्या करण्यात आल्या नसल्याने हा त्रास उद्भवत असल्याचे उद्योजकांनी सांगितले. येथील वीज यंत्रणा दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून ते निविदा प्रक्रियेत आहे.
औद्योगिक वसाहतीत वीज गायब
चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांना पावासासोबत महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका बसला...
Maharashtra Times 3 Jun 2018, 4:00 am