म. टा. प्रतिनिधी, जालना
जालना ही उद्योग आणि व्यापाऱ्यांची भूमी आहे. येथील स्थानिक उद्योजकांनी स्वत;च्या कष्टातून उद्योगांची उभारणी केली आहे. बियाणे, स्टीलसह अन्य उद्योग व्यापारात जालन्याचे नाव जगाचे नकाशावर पोहचले आहे. रोटरी क्लब जालनाच्या वतीने गेल्या दहा वर्षांपासून उद्योग आणि व्यापाराला चालना देण्यासाठी जालना एक्स्पोचे आयोजन करण्याची जी परंपरा सुरू केली आहे, ती पुढेही अशीच रहावी. प्रदर्शन भरवण्यासाठी कायमस्वरुपी जागा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अद्यावत प्रस्ताव सादर करावा. या प्रस्तावाचा पाठपुरावा करत मुख्यमंत्री, उद्योगमंत्र्यांशी चर्चा करून आंतरराष्ट्रीय पातळीवरचे प्रदर्शन सेंटर जालन्यात उभारले जाईल, असे आश्वासन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिले.
रोटरी क्लब ऑफ जालन्याच्या वतीने आयोजित जालना एक्स्पो २०१७ च्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, माजी आमदार कैलास गोरंट्याल, अरविंद चव्हाण, जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे, पोलिस अधीक्षक रामनाथ पोकळे, महिको कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र बारवाले, रोटरी क्लबचे डिस्ट्रीक्ट गर्व्हनर व्यंकटेश चन्ना, अकलांक मिश्रीकोटकर, डॉ. दीपक बगडीया, उद्योजक सुनिलाभाई रायठठ्ठा यांची उपस्थिती होती. शीला रायठठ्ठा यांनी पसायदान सादर करून उद्घाटन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. पुढे बोलताना खोतकर म्हणाले, ‘जालना एक्स्पोच्या माध्यमातून तंत्रज्ञानासह वेगवेगळ्या क्षेत्रात नेमके काय सुरू आहे याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचण्यास मदत होते. महिकोचे संस्थापक स्व. डॉ. बद्रीनारायण बारवाले तसेच सुनीलभाई रायठठ्ठा, विक्रम चहा, सीता मोहिते आदिंनी जालन्याचे नाव देश आणि परदेशात मोठे केले. दरम्यान, त्यांनी जळगाव येथील लक्ष्मीबाई यांनी लंडन येथे जाऊन जी खानावळ उघडली आहे. त्यातून त्यांनी भारताचे नाव मोठे केले आहे. लक्ष्मीबाई यांनी किती संघर्षातून लंडन येथे उद्योग स्थापन केला. बचत गटाच्या माध्यमातून सिताबाई मोहिते यांनी मोठे कार्य केले आहे.’
रोटरी क्लबने पोलिओ उच्चाटनानंतर आता साक्षरता अभियान तसेच मिशन इंद्रधनुष्य हाती घेतले आहे. त्यासाठी कुठलीही मदत लागल्यास आपल्याला हाक द्यावी, आपण तत्परतेने हावी ती मदत करु, असे आश्वासन व्यंकटेश चन्ना यांनी दिले.
जालन्यातील शंकर महाराजांचा चिवडा तसेच बप्पा, मामा यांचे पेढे अत्यंत दर्जेदार असतात. परंतु त्यांना ब्रँड नसल्याने ते मागे आहेत. त्यामुळे ग्लोबल मार्केटिंग प्रमाणे स्थानिक उत्पादनांनाही ब्रँड मिळवून द्यावा, असे आवाहन माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केले.
एक्स्पोमध्ये रोटरी क्लबच्या इन्नरव्हिल या महिलांच्या क्लबने बचत गटांसाठी जी जागा आणि त्यांना येथे आणण्यासाठी केलेले प्रयत्न हे प्रेरणादायी असल्याचे नगराध्यक्षा संगिता गोरंट्याल म्हणाल्या. भविष्यात यंत्र मानव अर्थात रोबोटीक तंत्रज्ञान ही काळाची गरज असून सध्या एकट्या औरंगाबादेतील उद्योग जगतात पाचशे यंत्र मानव कार्यरत असून भविष्यात ती संख्या एक हजारापर्यंत जाईल, असे प्रसाद कोकीळ यांनी सांगितले.
पुढील दोन दिवसात जास्तीत-जास्त जालनेकरांनी भेट द्यावी, असे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष अकलांक मिश्रीकोटकर यांनी केले आहे. जालन्यात आयोजित या एक्स्पोमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानांची जत्राच भरलेली आहे. त्याचे अकलन करुन काही नवीन युवक-युवती उद्योग, व्यापारात पुढे आल्यास या प्रदर्शनाचा हेतू साध्य होईल, असे सुनिलभाई रायठठ्ठा म्हणाले. सूत्रसंचालन प्राचार्य डॉ. रमेश अग्रवाल यांनी तर आभार रोटरीचे सचिव डॉ. दीपक बगडीया यांनी मानले.
जालना ही उद्योग आणि व्यापाऱ्यांची भूमी आहे. येथील स्थानिक उद्योजकांनी स्वत;च्या कष्टातून उद्योगांची उभारणी केली आहे. बियाणे, स्टीलसह अन्य उद्योग व्यापारात जालन्याचे नाव जगाचे नकाशावर पोहचले आहे. रोटरी क्लब जालनाच्या वतीने गेल्या दहा वर्षांपासून उद्योग आणि व्यापाराला चालना देण्यासाठी जालना एक्स्पोचे आयोजन करण्याची जी परंपरा सुरू केली आहे, ती पुढेही अशीच रहावी. प्रदर्शन भरवण्यासाठी कायमस्वरुपी जागा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अद्यावत प्रस्ताव सादर करावा. या प्रस्तावाचा पाठपुरावा करत मुख्यमंत्री, उद्योगमंत्र्यांशी चर्चा करून आंतरराष्ट्रीय पातळीवरचे प्रदर्शन सेंटर जालन्यात उभारले जाईल, असे आश्वासन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिले.
रोटरी क्लब ऑफ जालन्याच्या वतीने आयोजित जालना एक्स्पो २०१७ च्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, माजी आमदार कैलास गोरंट्याल, अरविंद चव्हाण, जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे, पोलिस अधीक्षक रामनाथ पोकळे, महिको कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र बारवाले, रोटरी क्लबचे डिस्ट्रीक्ट गर्व्हनर व्यंकटेश चन्ना, अकलांक मिश्रीकोटकर, डॉ. दीपक बगडीया, उद्योजक सुनिलाभाई रायठठ्ठा यांची उपस्थिती होती. शीला रायठठ्ठा यांनी पसायदान सादर करून उद्घाटन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. पुढे बोलताना खोतकर म्हणाले, ‘जालना एक्स्पोच्या माध्यमातून तंत्रज्ञानासह वेगवेगळ्या क्षेत्रात नेमके काय सुरू आहे याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचण्यास मदत होते. महिकोचे संस्थापक स्व. डॉ. बद्रीनारायण बारवाले तसेच सुनीलभाई रायठठ्ठा, विक्रम चहा, सीता मोहिते आदिंनी जालन्याचे नाव देश आणि परदेशात मोठे केले. दरम्यान, त्यांनी जळगाव येथील लक्ष्मीबाई यांनी लंडन येथे जाऊन जी खानावळ उघडली आहे. त्यातून त्यांनी भारताचे नाव मोठे केले आहे. लक्ष्मीबाई यांनी किती संघर्षातून लंडन येथे उद्योग स्थापन केला. बचत गटाच्या माध्यमातून सिताबाई मोहिते यांनी मोठे कार्य केले आहे.’
रोटरी क्लबने पोलिओ उच्चाटनानंतर आता साक्षरता अभियान तसेच मिशन इंद्रधनुष्य हाती घेतले आहे. त्यासाठी कुठलीही मदत लागल्यास आपल्याला हाक द्यावी, आपण तत्परतेने हावी ती मदत करु, असे आश्वासन व्यंकटेश चन्ना यांनी दिले.
जालन्यातील शंकर महाराजांचा चिवडा तसेच बप्पा, मामा यांचे पेढे अत्यंत दर्जेदार असतात. परंतु त्यांना ब्रँड नसल्याने ते मागे आहेत. त्यामुळे ग्लोबल मार्केटिंग प्रमाणे स्थानिक उत्पादनांनाही ब्रँड मिळवून द्यावा, असे आवाहन माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केले.
एक्स्पोमध्ये रोटरी क्लबच्या इन्नरव्हिल या महिलांच्या क्लबने बचत गटांसाठी जी जागा आणि त्यांना येथे आणण्यासाठी केलेले प्रयत्न हे प्रेरणादायी असल्याचे नगराध्यक्षा संगिता गोरंट्याल म्हणाल्या. भविष्यात यंत्र मानव अर्थात रोबोटीक तंत्रज्ञान ही काळाची गरज असून सध्या एकट्या औरंगाबादेतील उद्योग जगतात पाचशे यंत्र मानव कार्यरत असून भविष्यात ती संख्या एक हजारापर्यंत जाईल, असे प्रसाद कोकीळ यांनी सांगितले.
पुढील दोन दिवसात जास्तीत-जास्त जालनेकरांनी भेट द्यावी, असे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष अकलांक मिश्रीकोटकर यांनी केले आहे. जालन्यात आयोजित या एक्स्पोमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानांची जत्राच भरलेली आहे. त्याचे अकलन करुन काही नवीन युवक-युवती उद्योग, व्यापारात पुढे आल्यास या प्रदर्शनाचा हेतू साध्य होईल, असे सुनिलभाई रायठठ्ठा म्हणाले. सूत्रसंचालन प्राचार्य डॉ. रमेश अग्रवाल यांनी तर आभार रोटरीचे सचिव डॉ. दीपक बगडीया यांनी मानले.