म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
'शिवसेनेने राज्यात काढलेली जन आशीर्वाद यात्रा ही मतांसाठी नसून मतदारांचे आभार मानण्यासाठी आहे. शिवसेनेच्या विरोधात काम करणाऱ्या मतदारांचे मन वळवून त्यांना शिवसेनेचे प्रेम कसे असते हे दाखवायचे आहे. त्यामुळे जन आशीर्वाद यात्रा माझ्यासाठी 'तीर्थयात्रा' आहे. यातून कर्जमुक्त शेतकरी, प्रदूषणमुक्त व भगवा महाराष्ट्र घडवण्यासाठी शिवसेनेचे हात बळकट करा,' असे आवाहन युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी वैजापूर येथे आयोजित जाहीर सभेत केले.
ही सभा तब्बल सहा तास उशिरा सुरू झाली. यावेळी त्यांचे गुलाबपाकळ्या उधळून स्वागत करण्यात आले. शिवसेनेचे तालुका प्रमुख रमेश पाटील बोरनारे, उपजिल्हा प्रमुख बाबासाहेब जगताप, उपनगराध्यक्ष साबेरखान, युवा सेनेचे सचिन वाणी, आमीर अली, महेश बुनगे यांच्यासह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे यांचे स्वागत केले. ठाकरे यांच्यासह आमदार अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी आमदार आर. एम. वाणी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी ठाकरे यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी ऋषिकेश राजपूत, बाळा सुतवणे आदींसह अनेक युवा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले.
ठाकरे म्हणाले, आर्थिक मंदी व दुष्काळाचा सामना सर्वांनी एकत्र येऊन करायचा आहे. शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे राज्यातील दहा लाख शेतकऱ्यांना ९६० कोटी रुपयांचा पीक विम्याचा लाभ मिळाला. सत्तेत असूनही शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी शिवसेनेला प्रयत्न करावे लागले. आम्हाला कर्जमाफी नको आहे, कारण माफी गुन्हेगाराला दिली जाते. शेतकरी हा गुन्हेगार नाही. त्यामुळे शेतकऱ्याला सरसकट कर्जमुक्ती मिळाली पाहिजे. ही कर्जमुक्ती मिळवण्यासाठी, शेतकऱ्यांचे अन्य प्रश्न, सिंचनाचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेनेला भरभरून आशीर्वाद द्या, असे आवाहन ठाकरे यांनी केले. निवडणुकीतील विजय साजरा करण्यासाठी मी पुन्हा वैजापूरला येईन, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी वैजापूर व गंगापूर तालुका मतदारसंघातर्फे लाकडी बैलगाडी व बैलजोडी भेट देण्यात आली. ठाकरे यांनी बैलपूजा करत व पुरणपोळीचा प्रसाद देऊन पोळा साजरा केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुनील गायकवाड यांनी केले. जिल्हा परिषद सदस्य अविनाश गलांडे, मनाजी मिसाळ, राजेंद्र साळुंके, बद्रिनाथ खंडागळे आदींसह शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
'शिवसेनेने राज्यात काढलेली जन आशीर्वाद यात्रा ही मतांसाठी नसून मतदारांचे आभार मानण्यासाठी आहे. शिवसेनेच्या विरोधात काम करणाऱ्या मतदारांचे मन वळवून त्यांना शिवसेनेचे प्रेम कसे असते हे दाखवायचे आहे. त्यामुळे जन आशीर्वाद यात्रा माझ्यासाठी 'तीर्थयात्रा' आहे. यातून कर्जमुक्त शेतकरी, प्रदूषणमुक्त व भगवा महाराष्ट्र घडवण्यासाठी शिवसेनेचे हात बळकट करा,' असे आवाहन युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी वैजापूर येथे आयोजित जाहीर सभेत केले.
ही सभा तब्बल सहा तास उशिरा सुरू झाली. यावेळी त्यांचे गुलाबपाकळ्या उधळून स्वागत करण्यात आले. शिवसेनेचे तालुका प्रमुख रमेश पाटील बोरनारे, उपजिल्हा प्रमुख बाबासाहेब जगताप, उपनगराध्यक्ष साबेरखान, युवा सेनेचे सचिन वाणी, आमीर अली, महेश बुनगे यांच्यासह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे यांचे स्वागत केले. ठाकरे यांच्यासह आमदार अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी आमदार आर. एम. वाणी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी ठाकरे यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी ऋषिकेश राजपूत, बाळा सुतवणे आदींसह अनेक युवा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले.
ठाकरे म्हणाले, आर्थिक मंदी व दुष्काळाचा सामना सर्वांनी एकत्र येऊन करायचा आहे. शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे राज्यातील दहा लाख शेतकऱ्यांना ९६० कोटी रुपयांचा पीक विम्याचा लाभ मिळाला. सत्तेत असूनही शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी शिवसेनेला प्रयत्न करावे लागले. आम्हाला कर्जमाफी नको आहे, कारण माफी गुन्हेगाराला दिली जाते. शेतकरी हा गुन्हेगार नाही. त्यामुळे शेतकऱ्याला सरसकट कर्जमुक्ती मिळाली पाहिजे. ही कर्जमुक्ती मिळवण्यासाठी, शेतकऱ्यांचे अन्य प्रश्न, सिंचनाचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेनेला भरभरून आशीर्वाद द्या, असे आवाहन ठाकरे यांनी केले. निवडणुकीतील विजय साजरा करण्यासाठी मी पुन्हा वैजापूरला येईन, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी वैजापूर व गंगापूर तालुका मतदारसंघातर्फे लाकडी बैलगाडी व बैलजोडी भेट देण्यात आली. ठाकरे यांनी बैलपूजा करत व पुरणपोळीचा प्रसाद देऊन पोळा साजरा केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुनील गायकवाड यांनी केले. जिल्हा परिषद सदस्य अविनाश गलांडे, मनाजी मिसाळ, राजेंद्र साळुंके, बद्रिनाथ खंडागळे आदींसह शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.