म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आयआयटीसह इतर अभियांत्रिकी कॉलेजांसाठी देशपातळीवर घेण्यात आलेल्या संयुक्त प्रवेश परीक्षा ‘जेईई-अॅडव्हान्स’चा निकाल रविवारी जाहीर झाला. औरंगाबादच्या विद्यार्थ्यांनी टॉप टेनमध्ये धडक मारली आहे, तर त्यासह २००पेक्षा अधिक विद्यार्थी आयआयटीला पात्र ठरण्याची शक्यता आहे. निकालानंतर विविध ठिकाणी विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा केला.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) २ एप्रिल रोजी ‘जेईई-मेन’ परीक्षा घेण्यात आली. देशभरातून दहालाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यातून सुमारे दीड लाख विद्यार्थी अॅडव्हान्ससाठी पात्र ठरले. २१ मे रोजी जेईई अॅडव्हान्स घेण्यात आली. त्याचा निकाल रविवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत औरंगाबादच्या विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केल्याचे निकालातून समोर आले आहे. टॉप टेन विद्यार्थ्यांमध्ये औरंगाबादच्या ओंकार माणिक देशपांडे याने स्थान मिळविले. त्याचा देशभरात ८वा रँक आहे. ३६६पैकी ३२७ गुण त्याला आहेत. शुभम अत्री याने १८वा रँक मिळविला आहे. जतीन लांबे (३३), अर्श गौतम (७२), अभ्युद्य भारतीया (१०४), अर्थव पवार (१४६), मिहीर जावळीकर (१६२), ऋषिकेश नजन (१६५) अशी विद्यार्थ्यांनी औरंगाबादला आयआयटीत स्थान मिळवून दिले आहे.
नऊ वर्षांनंतर मोठे यश
जेईई परीक्षेत औरंगाबादच्या ओकांर देशपांडे याने ८वा रँक मिळविला. औरंगाबाद विद्यार्थी नऊ वर्षांनंतर जेईईत टॉप टेनमध्ये आला आहे. २००८मध्ये निशांत तोतला देशभरात दुसरा रँक मिळविला होता. ओकांरच्या यशाने पुन्हा आयआयटीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
नारायणाचे ९२ विद्यार्थी पात्र
जेईई अॅडव्हान्समध्ये नारायणा इन्स्टिट्यूटच्या ९२ विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. आयआयटीसाठी पात्र ठरलेल्या या विद्यार्थ्यांचा नारायणा इन्स्टिट्यूटतर्फे सत्कार करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये शुभम अत्री (१८), जतीन लांबे (३३), अर्श गौतम (७२), अभ्युद्य भारतीया (१०४), अर्थव पवार (१४६), महेश काळे (४२९), धनजंय राऊत (८२१), वरद जोशी(९८०) यांचा समावेश आहे. पाटीदार भवनमध्ये झालेल्या या कार्यक्रमासाठी संस्थेचे डॉ. एम. एफ. मल्लिक, प्रा. विशाल लदनिया, दत्ता जाधव, प्रा. संतोष कालुंगे, प्रा. दुर्गेश सिंग, प्रा. गोधन सिंग, प्रा. अब्दुल हन्नान, प्रा. सुनिल झा, प्रा. प्रदिप शुक्ला, प्रा. संजय सिंग, प्रा. प्रशांत शुल्का यांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. मल्लिक म्हणाले कोणत्याही यशाकरिता जिद्द असणे आवश्यक आहे. जिद्द टिकवून त्यास योग्य ते मार्गदर्शन मिळाले तर यश हमखास मिळते. उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी यावेळी आनंद साजरा केला. कार्यक्रमाला पालकांचीही उपस्थिती होती.
गुरुकुलचे विद्यार्थ्यांचे यश
जेईई-अॅडव्हान्समध्ये गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनीही नेत्रदीपक कामगिरी केली. यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. क्लासेसचे २८ विद्यार्थी यशस्वी ठरले. या विद्यार्थ्यांमध्ये ओकांर देशपांडे (८), मिहिर जावळीवर(१६२), महिमा पटेल (१११), खेमराज बावस्कर (५८६) यांचा समावेश आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचा निर्मल बिश्वास यांनी सत्कार केला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत औरंगाबादच्या निकालात यंदा वाढ झाल्याचे सांगितले. शैक्षणिक हब म्हणून औरंगाबादची ओळख या निकालाने अधिक घट्ट होईल, असेही ते म्हणाले.
नियमित अभ्यास आणि त्याचा सराव यावरच माझा भर असायचा. टेस्ट पेपरही सोडवित होतो. त्याचा फायदा झाला. अभ्यासाचे वेळापत्रक ठरविले होते. त्यानुसार अभ्यास केला. शिक्षकांचे मार्गदर्शनही महत्वाचे ठरले.
- ऋषिकेश नजन
अभ्यासात सातत्य ठेवले. ठराविक विषयाचाच अधिक अभ्यास केला नाही. नियमित अभ्यास, सरावावर भर दिल्यामुळे मी पात्र ठरू शकलो. मला मेकॅनिकल इंजिनीअरिंगची आवड आहे. रँकनुसार संधी कोठे मिळते हे पाहू.
- अवधूत सुरडकर
छोट्या-छोट्या नोट्स काढून अभ्यास केला. क्लास टेस्टमधील नियमित अभ्यासाकडे लक्ष दिले. मार्गदर्शकांचे उत्तम मार्गदर्शन मिळाले. अभ्यासाचे वेळापत्रक करण्यापेक्षा आपण जे करू ते मनापासून करायला हवे.
- प्रणाली संचेती
दोन वर्षांपासून तयारी करतो आहे. दहावीपासूनच आयआयटीला जायचे ठरवलेले होते. मेन्सच्या निकालानंतर अॅडव्हान्सची तयारी कशी करावी, याकडे लक्ष दिले. विषयाच्या मुळाशी जाऊन, प्रत्येक प्रश्नाचा सराव केला. साधारणतः ९ ते १० तास अभ्यास करीत होतो.
- सैफ अली खान
आयआयटीसह इतर अभियांत्रिकी कॉलेजांसाठी देशपातळीवर घेण्यात आलेल्या संयुक्त प्रवेश परीक्षा ‘जेईई-अॅडव्हान्स’चा निकाल रविवारी जाहीर झाला. औरंगाबादच्या विद्यार्थ्यांनी टॉप टेनमध्ये धडक मारली आहे, तर त्यासह २००पेक्षा अधिक विद्यार्थी आयआयटीला पात्र ठरण्याची शक्यता आहे. निकालानंतर विविध ठिकाणी विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा केला.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) २ एप्रिल रोजी ‘जेईई-मेन’ परीक्षा घेण्यात आली. देशभरातून दहालाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यातून सुमारे दीड लाख विद्यार्थी अॅडव्हान्ससाठी पात्र ठरले. २१ मे रोजी जेईई अॅडव्हान्स घेण्यात आली. त्याचा निकाल रविवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत औरंगाबादच्या विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केल्याचे निकालातून समोर आले आहे. टॉप टेन विद्यार्थ्यांमध्ये औरंगाबादच्या ओंकार माणिक देशपांडे याने स्थान मिळविले. त्याचा देशभरात ८वा रँक आहे. ३६६पैकी ३२७ गुण त्याला आहेत. शुभम अत्री याने १८वा रँक मिळविला आहे. जतीन लांबे (३३), अर्श गौतम (७२), अभ्युद्य भारतीया (१०४), अर्थव पवार (१४६), मिहीर जावळीकर (१६२), ऋषिकेश नजन (१६५) अशी विद्यार्थ्यांनी औरंगाबादला आयआयटीत स्थान मिळवून दिले आहे.
नऊ वर्षांनंतर मोठे यश
जेईई परीक्षेत औरंगाबादच्या ओकांर देशपांडे याने ८वा रँक मिळविला. औरंगाबाद विद्यार्थी नऊ वर्षांनंतर जेईईत टॉप टेनमध्ये आला आहे. २००८मध्ये निशांत तोतला देशभरात दुसरा रँक मिळविला होता. ओकांरच्या यशाने पुन्हा आयआयटीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
नारायणाचे ९२ विद्यार्थी पात्र
जेईई अॅडव्हान्समध्ये नारायणा इन्स्टिट्यूटच्या ९२ विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. आयआयटीसाठी पात्र ठरलेल्या या विद्यार्थ्यांचा नारायणा इन्स्टिट्यूटतर्फे सत्कार करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये शुभम अत्री (१८), जतीन लांबे (३३), अर्श गौतम (७२), अभ्युद्य भारतीया (१०४), अर्थव पवार (१४६), महेश काळे (४२९), धनजंय राऊत (८२१), वरद जोशी(९८०) यांचा समावेश आहे. पाटीदार भवनमध्ये झालेल्या या कार्यक्रमासाठी संस्थेचे डॉ. एम. एफ. मल्लिक, प्रा. विशाल लदनिया, दत्ता जाधव, प्रा. संतोष कालुंगे, प्रा. दुर्गेश सिंग, प्रा. गोधन सिंग, प्रा. अब्दुल हन्नान, प्रा. सुनिल झा, प्रा. प्रदिप शुक्ला, प्रा. संजय सिंग, प्रा. प्रशांत शुल्का यांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. मल्लिक म्हणाले कोणत्याही यशाकरिता जिद्द असणे आवश्यक आहे. जिद्द टिकवून त्यास योग्य ते मार्गदर्शन मिळाले तर यश हमखास मिळते. उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी यावेळी आनंद साजरा केला. कार्यक्रमाला पालकांचीही उपस्थिती होती.
गुरुकुलचे विद्यार्थ्यांचे यश
जेईई-अॅडव्हान्समध्ये गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनीही नेत्रदीपक कामगिरी केली. यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. क्लासेसचे २८ विद्यार्थी यशस्वी ठरले. या विद्यार्थ्यांमध्ये ओकांर देशपांडे (८), मिहिर जावळीवर(१६२), महिमा पटेल (१११), खेमराज बावस्कर (५८६) यांचा समावेश आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचा निर्मल बिश्वास यांनी सत्कार केला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत औरंगाबादच्या निकालात यंदा वाढ झाल्याचे सांगितले. शैक्षणिक हब म्हणून औरंगाबादची ओळख या निकालाने अधिक घट्ट होईल, असेही ते म्हणाले.
नियमित अभ्यास आणि त्याचा सराव यावरच माझा भर असायचा. टेस्ट पेपरही सोडवित होतो. त्याचा फायदा झाला. अभ्यासाचे वेळापत्रक ठरविले होते. त्यानुसार अभ्यास केला. शिक्षकांचे मार्गदर्शनही महत्वाचे ठरले.
- ऋषिकेश नजन
अभ्यासात सातत्य ठेवले. ठराविक विषयाचाच अधिक अभ्यास केला नाही. नियमित अभ्यास, सरावावर भर दिल्यामुळे मी पात्र ठरू शकलो. मला मेकॅनिकल इंजिनीअरिंगची आवड आहे. रँकनुसार संधी कोठे मिळते हे पाहू.
- अवधूत सुरडकर
छोट्या-छोट्या नोट्स काढून अभ्यास केला. क्लास टेस्टमधील नियमित अभ्यासाकडे लक्ष दिले. मार्गदर्शकांचे उत्तम मार्गदर्शन मिळाले. अभ्यासाचे वेळापत्रक करण्यापेक्षा आपण जे करू ते मनापासून करायला हवे.
- प्रणाली संचेती
दोन वर्षांपासून तयारी करतो आहे. दहावीपासूनच आयआयटीला जायचे ठरवलेले होते. मेन्सच्या निकालानंतर अॅडव्हान्सची तयारी कशी करावी, याकडे लक्ष दिले. विषयाच्या मुळाशी जाऊन, प्रत्येक प्रश्नाचा सराव केला. साधारणतः ९ ते १० तास अभ्यास करीत होतो.
- सैफ अली खान