म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'आयआयटी' आणि 'एनआयटी' प्रवेशासाठी देशपातळीवर घेण्यात आलेल्या 'जेईई अॅडव्हान्स'चा निकालात मोठी घसरण झाली आहे. मागील वर्षी पहिल्या दहामध्ये यश मिळविलेल्या औरंगाबादचा यंदा दोन आकड्यांमध्येही विद्यार्थ्यांचा रँक नाही. पहिल्यांदाच झालेली ऑनलाइन परीक्षा, वाढलेली काठिण्य पातळी यामुळे निकालात घसरण झाल्याचे तज्ज्ञांना वाटते.
अॅडव्हान्स ऑनलाइन परीक्षेला देशभरातून एक लाख ५५ हजार १५८ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १८ हजार १३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकाला महाराष्ट्राची घसरण झाल्याचे समोर आले आहे. २०१७मधील परीक्षेत औरंगाबादच्या ओंकार देशपांडे याने देशभरात आठवा क्रमांक मिळविला होता. अनेक विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवित देशभरात औरंगाबादचे नाव उंचावले. आज जाहीर झालेल्या निकालात रँक अतिशय खाली घसल्याचे समोर आले आहे. एक अंकी, दोन अंकीही रँक मिळविणेही शक्य झाले नाही. एक हजार, दोन हजार त्यापेक्षा अधिक रँकचे विद्यार्थी असल्याने हव्यात्या 'आयआयटी'मध्ये आणि अपेक्षित शाखेला प्रवेश मिळणे विद्यार्थ्यांना मोठी स्पर्धा असणार आहे.
\Bऑनलाइन, काठिण्य पातळी वाढली\B
यंदा पहिल्यांदा अॅडव्हान्स ऑनलाइन घेण्यात आली. त्याचाही परिणाम निकालावर जाणविल्याचे तज्ज्ञांना वाटते. प्रश्नपत्रिकेची वाढलेली काठिण्य पातळीही निकालावर परिणाम करणारी असल्याचे चित्र आहे. कॉलेजपेक्षा क्लासेसवरील भरही निकाल घटविण्यास कारणीभूत असल्याची चर्चा आहे.
निकालात मोठी घसरण झाली आहे. माझ्यासह अनेक विद्यार्थ्यांचे रँक कमी आले आहेत. प्रश्नपत्रिका अवघड होती. मेन्सचाही निकाल कमीच लागला होता. त्यातुलनेत अॅडव्हान्सचा घसरला.
- गणराज अच्युतराव बोराडे, ११८७ रँक.
'आयआयटी'चे एक वैशिष्ट आहे, यामध्ये आजपर्यंत प्रश्नपत्रिकेत एकही प्रश्न पुन्हा विचारलेला नाही. त्यासह यंदा ऑनलाइन परीक्षेचाही परिणाम निकालावर दिसतो आहे. पहिल्या दहा विद्यार्थ्यांमध्ये असणारे शहर यंदा दोन आकड्यातही नाही.
- रजनीकांत गरूड, उपप्राचार्य, देवगिरी कॉलेज.
'आयआयटी' आणि 'एनआयटी' प्रवेशासाठी देशपातळीवर घेण्यात आलेल्या 'जेईई अॅडव्हान्स'चा निकालात मोठी घसरण झाली आहे. मागील वर्षी पहिल्या दहामध्ये यश मिळविलेल्या औरंगाबादचा यंदा दोन आकड्यांमध्येही विद्यार्थ्यांचा रँक नाही. पहिल्यांदाच झालेली ऑनलाइन परीक्षा, वाढलेली काठिण्य पातळी यामुळे निकालात घसरण झाल्याचे तज्ज्ञांना वाटते.
अॅडव्हान्स ऑनलाइन परीक्षेला देशभरातून एक लाख ५५ हजार १५८ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १८ हजार १३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकाला महाराष्ट्राची घसरण झाल्याचे समोर आले आहे. २०१७मधील परीक्षेत औरंगाबादच्या ओंकार देशपांडे याने देशभरात आठवा क्रमांक मिळविला होता. अनेक विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवित देशभरात औरंगाबादचे नाव उंचावले. आज जाहीर झालेल्या निकालात रँक अतिशय खाली घसल्याचे समोर आले आहे. एक अंकी, दोन अंकीही रँक मिळविणेही शक्य झाले नाही. एक हजार, दोन हजार त्यापेक्षा अधिक रँकचे विद्यार्थी असल्याने हव्यात्या 'आयआयटी'मध्ये आणि अपेक्षित शाखेला प्रवेश मिळणे विद्यार्थ्यांना मोठी स्पर्धा असणार आहे.
\Bऑनलाइन, काठिण्य पातळी वाढली\B
यंदा पहिल्यांदा अॅडव्हान्स ऑनलाइन घेण्यात आली. त्याचाही परिणाम निकालावर जाणविल्याचे तज्ज्ञांना वाटते. प्रश्नपत्रिकेची वाढलेली काठिण्य पातळीही निकालावर परिणाम करणारी असल्याचे चित्र आहे. कॉलेजपेक्षा क्लासेसवरील भरही निकाल घटविण्यास कारणीभूत असल्याची चर्चा आहे.
निकालात मोठी घसरण झाली आहे. माझ्यासह अनेक विद्यार्थ्यांचे रँक कमी आले आहेत. प्रश्नपत्रिका अवघड होती. मेन्सचाही निकाल कमीच लागला होता. त्यातुलनेत अॅडव्हान्सचा घसरला.
- गणराज अच्युतराव बोराडे, ११८७ रँक.
'आयआयटी'चे एक वैशिष्ट आहे, यामध्ये आजपर्यंत प्रश्नपत्रिकेत एकही प्रश्न पुन्हा विचारलेला नाही. त्यासह यंदा ऑनलाइन परीक्षेचाही परिणाम निकालावर दिसतो आहे. पहिल्या दहा विद्यार्थ्यांमध्ये असणारे शहर यंदा दोन आकड्यातही नाही.
- रजनीकांत गरूड, उपप्राचार्य, देवगिरी कॉलेज.