अ‍ॅपशहर

दशक्रिया करताना फक्त मूठभर राख टाका

‘दशक्रिया विधी करताना मृताचे जुने कपडे व साहित्य नदीत टाकू नये, तसेच फक्त मूठभर राख फक्त आणावी, उर्वरित राख शेतात टाकावी. त्यावर वृक्षारोपण करून स्मृती जपावी,’ असे आवाहन श्रीक्षेत्र देवगड संस्थानचे भास्करगिरी महाराज यांनी केले आहे.

Maharashtra Times 22 Nov 2017, 3:00 am
वाळूज महानगरः ‘दशक्रिया विधी करताना मृताचे जुने कपडे व साहित्य नदीत टाकू नये, तसेच फक्त मूठभर राख फक्त आणावी, उर्वरित राख शेतात टाकावी. त्यावर वृक्षारोपण करून स्मृती जपावी,’ असे आवाहन श्रीक्षेत्र देवगड संस्थानचे भास्करगिरी महाराज यांनी केले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम just few ashes drop
दशक्रिया करताना फक्त मूठभर राख टाका

गंगापूर तालुक्यातील कायगाव येथे गोदावरी नदीच्या घाटावर बांधलेल्या अस्थिकुंड, सभामंडप, सीसीटीव्ही कॅमेरा यांचे लोकार्पण रविवारी श्रीक्षेत्र देवगड संस्थानचे भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. वृक्षारोपण केल्याने पर्यावरणाचा समतोल राखला जाईल, अशी आठवण त्यांनी करून दिली. नदीच्या घाटावरील विकास कामांसाठी पालकमंत्र्यांच्या पर्यटन विकास निधीतून साठ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. हे काम जिल्हा परिषद सदस्य संतोष माने यांच्या प्रयत्नातून करण्यात आले. याप्रसंगी खासदार चंद्रकांत खैरे, माजी आमदार आण्णासाहेब माने, जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर, दिनेश मुथा, जिल्हा परिषद सदस्या स्वाती निरफळ, मनीषा सिदलंबे, मंगलबाई राजपूत, मीनाक्षी गायकवाड, जनार्धन मेटे महाराज, सुभाष कानडे, तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज