Makarand.kulkarni@timesgroup.com
Tweet@makarandkMT
औरंगाबाद : जिल्हा परिषदेने बांधलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरुस्ती आणि त्यांना दरवाजे (गेट) बसविण्यासाठी सुमारे साडेअकरा कोटी रुपयांची गरज आहे, मात्र करोना विषाणू संकर्गामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटात कोल्हापुरी दरवाजांसाठी पैसा कोठून आणावा, असा पेच जिल्हा परिषदेसमोर निर्माण झाला आहे.
जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागांतर्गत जिल्ह्यात ५८५ कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले आहेत. या बंधाऱ्यांच्या दरवाजांचा (गेट) प्रश्न वर्षानुवर्षे चर्चेत आहे. दोन वर्षांपूर्वी 'गेट' बसविण्यासाठी उपकरातून पावणेदोन कोटींची तरतूद केली होती. खरेदी होऊनही अजून बहुतांश गेट बसविलेले नाहीत. दरम्यान, ६२ कोल्हापुरी बंधाऱ्यांचे गेल्या काही वर्षांत नुकसान झाले असून, त्याच्या दुरुस्ती व नवीन 'गेट' बसविण्यासाठी आठ कोटी ४५ लाखांच्या निधीची आवश्यकता आहे. त्याशिवाच तीन हजार १०५ 'गेट' खरेदीसाठी तीन कोटींची गरज आहे. हा निधी कोठून मिळणार, असा प्रश्न आहे.
राज्य सरकाराने कोल्हापुरी बंधाऱ्यांमध्ये टप्प्याटप्प्यांने 'गेट' बसविण्याची कार्यवाही ३१ ऑगस्टनंतर करण्याबाबत सूचना दिली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात यंदा जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे खरिपाचा आशा पल्लवीत झाल्या आहेत. सिंचनक्षेत्र वाढीस लागण्यासाठी कोल्हापुरी बंधाऱ्यांमध्ये पाणी साठणे आवश्यक आहे. यंदा कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या दुरुस्तीकडे लक्ष दिले गेले तर ५८५ पैकी ४८७ बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा होऊ शकतो. या ४८७ बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा झाल्यास भूगर्भातील पाणीपातळीत वाढ होऊन सुमारे सहा हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊ शकेल, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
जिल्ह्यातील १०५ कोल्हापुरी बंधाऱ्यांना तीन हजार १०५ 'गेट' आवश्यक असून, त्यासाठी तीन कोटींची आवश्यकता आहे, मात्र हा निधी आणायचा कोठून, असा प्रश्न आहे. यावर्षी करोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे सरकारने अनेक योजनांचा निधी आरोग्य यंत्रणेकडे वळविला आहे. प्राधान्यक्रम ठरवून निधीची तरतूद केली जात असल्याने तूर्तास तरी या प्रस्तावास मान्यता मिळेल की नाही, याबाबत शंका आहे. नुकसान झालेल्या ६२ कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी आठ कोटी ४५ लाख व गेट खरेदीसाठी तीन कोटी असे ११ कोटी ४५ लाख रुपयांची आवश्यकता आहे. हा निधी उपलब्ध झाला तर, सिंचन विभागाच्या कोल्हापुरी बंधाऱ्यांमधून १०० टक्के पाणीसाठा होऊ शकणार आहे.
बंधाऱ्यांसाठी दरवाजांची सध्याची उपलब्धता
२०१८ -१९मध्ये जलयुक्त शिवार योजनेंतर्गत दोन हजार २०० 'गेट' खरेदी करण्यात आले; तसेच जिल्हा परिषद उपकरातून एक हजार ३९८ असे एकूण तीन हजार ५९८ 'गेट' खरेदी केले आहेत. ३७९ 'गेट' खरेदीचे आदेश दिले असून, ३१ ऑगस्टअखेर हे 'गेट' प्राप्त होण्याची शक्यता आहे. २०२०-२१ मध्ये जिल्हा परिषद उपकरांतर्गत १८ कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांसाठी ६०० दरवाजे खरेदीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यासाठी ६५ लाखांच्या अंजादपत्रकाला प्रशासकीय मान्यता दिली असून, निविदा प्रक्रिया सुरू आहे.
Tweet@makarandkMT
औरंगाबाद : जिल्हा परिषदेने बांधलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरुस्ती आणि त्यांना दरवाजे (गेट) बसविण्यासाठी सुमारे साडेअकरा कोटी रुपयांची गरज आहे, मात्र करोना विषाणू संकर्गामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटात कोल्हापुरी दरवाजांसाठी पैसा कोठून आणावा, असा पेच जिल्हा परिषदेसमोर निर्माण झाला आहे.
जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागांतर्गत जिल्ह्यात ५८५ कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले आहेत. या बंधाऱ्यांच्या दरवाजांचा (गेट) प्रश्न वर्षानुवर्षे चर्चेत आहे. दोन वर्षांपूर्वी 'गेट' बसविण्यासाठी उपकरातून पावणेदोन कोटींची तरतूद केली होती. खरेदी होऊनही अजून बहुतांश गेट बसविलेले नाहीत. दरम्यान, ६२ कोल्हापुरी बंधाऱ्यांचे गेल्या काही वर्षांत नुकसान झाले असून, त्याच्या दुरुस्ती व नवीन 'गेट' बसविण्यासाठी आठ कोटी ४५ लाखांच्या निधीची आवश्यकता आहे. त्याशिवाच तीन हजार १०५ 'गेट' खरेदीसाठी तीन कोटींची गरज आहे. हा निधी कोठून मिळणार, असा प्रश्न आहे.
राज्य सरकाराने कोल्हापुरी बंधाऱ्यांमध्ये टप्प्याटप्प्यांने 'गेट' बसविण्याची कार्यवाही ३१ ऑगस्टनंतर करण्याबाबत सूचना दिली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात यंदा जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे खरिपाचा आशा पल्लवीत झाल्या आहेत. सिंचनक्षेत्र वाढीस लागण्यासाठी कोल्हापुरी बंधाऱ्यांमध्ये पाणी साठणे आवश्यक आहे. यंदा कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या दुरुस्तीकडे लक्ष दिले गेले तर ५८५ पैकी ४८७ बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा होऊ शकतो. या ४८७ बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा झाल्यास भूगर्भातील पाणीपातळीत वाढ होऊन सुमारे सहा हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊ शकेल, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
जिल्ह्यातील १०५ कोल्हापुरी बंधाऱ्यांना तीन हजार १०५ 'गेट' आवश्यक असून, त्यासाठी तीन कोटींची आवश्यकता आहे, मात्र हा निधी आणायचा कोठून, असा प्रश्न आहे. यावर्षी करोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे सरकारने अनेक योजनांचा निधी आरोग्य यंत्रणेकडे वळविला आहे. प्राधान्यक्रम ठरवून निधीची तरतूद केली जात असल्याने तूर्तास तरी या प्रस्तावास मान्यता मिळेल की नाही, याबाबत शंका आहे. नुकसान झालेल्या ६२ कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी आठ कोटी ४५ लाख व गेट खरेदीसाठी तीन कोटी असे ११ कोटी ४५ लाख रुपयांची आवश्यकता आहे. हा निधी उपलब्ध झाला तर, सिंचन विभागाच्या कोल्हापुरी बंधाऱ्यांमधून १०० टक्के पाणीसाठा होऊ शकणार आहे.
बंधाऱ्यांसाठी दरवाजांची सध्याची उपलब्धता
२०१८ -१९मध्ये जलयुक्त शिवार योजनेंतर्गत दोन हजार २०० 'गेट' खरेदी करण्यात आले; तसेच जिल्हा परिषद उपकरातून एक हजार ३९८ असे एकूण तीन हजार ५९८ 'गेट' खरेदी केले आहेत. ३७९ 'गेट' खरेदीचे आदेश दिले असून, ३१ ऑगस्टअखेर हे 'गेट' प्राप्त होण्याची शक्यता आहे. २०२०-२१ मध्ये जिल्हा परिषद उपकरांतर्गत १८ कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांसाठी ६०० दरवाजे खरेदीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यासाठी ६५ लाखांच्या अंजादपत्रकाला प्रशासकीय मान्यता दिली असून, निविदा प्रक्रिया सुरू आहे.