मटा ऑनलाइन वृत्त । लातूर
काँग्रेसचा गड, देशमुखांची गढी मानल्या जाणाऱ्या लातूर महानरपालिकेच्या निवडणुकीत भाजपनं जोरदार मुसंडी मारली आहे. ज्या महापालिकेत गेली पाच वर्षं भाजपचा एकही नगरसेवक नव्हता, त्या पालिकेत त्यांचं 'कमळ' फुललं आहे. ७० सदस्यांच्या महापालिकेत भाजपनं ४१ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलंय आणि काँग्रेसची सत्ता उलथून टाकलीय. काँग्रेसनं २८ जागा जिंकल्यात, तर राष्ट्रवादीला फक्त एक जागा मिळाली आहे.
त्याचवेळी, ६५ जागांच्या परभणी महापालिकेत काँग्रेसनं राष्ट्रवादीला धोबीपछाड दिला आहे. त्यांनी ३१ जागांवर आघाडी मिळवली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस सात जागांवर पुढे आहे. परभणीतही भाजपची कामगिरीही सुधारली असून त्यांनी आठ जागांपर्यंत मजल मारली आहे. गेल्या निवडणुकीत त्यांचे फक्त दोन नगरसेवक निवडून आले होते. शिवसेना सात जागांवर आघाडीवर आहे.
'जलदूत'मुळे फुललं 'कमळ'!
गेल्या वर्षीच्या दुष्काळात केंद्र सरकारनं 'जलदूत' या ट्रेननं लातूरकरांना पाणीपुरवठा केला होता. या 'प्यायल्या पाण्याला जागत' नागरिकांनी भाजपला भरभरून मतदान केल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. त्याशिवाय, संभाजीराव पाटील-निलंगेकरांच्या नियोजनबद्ध प्रचारनीतीचंही हे यश मानलं जातंय. याउलट, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अमित देशमुख यांनी व्यक्तिक्रेंद्री प्रचार केल्याचा फटका काँग्रेसला बसला आहे.
लातूरमध्ये काँग्रेसचे ४९, राष्ट्रवादीचे १३, शिवसेनेचे ६ आणि रिपाइंचे २ नगरसेवक होते. हे चित्र यावेळी साफ पालटलं आहे. काँग्रेसच्या २१ जागा कमी झाल्यात, तर राष्ट्रवादीला डझनभर जागा गमवाव्या लागल्यात. शिवसेना आणि रिपाइं तर सपाट झाले आहेत. त्यांच्या सगळ्या जागा भाजपला मिळाल्यात आणि आता ते लातूरमध्ये पहिल्यांदाच सत्ता स्थापन करणार आहेत.
काँग्रेसचा गड, देशमुखांची गढी मानल्या जाणाऱ्या लातूर महानरपालिकेच्या निवडणुकीत भाजपनं जोरदार मुसंडी मारली आहे. ज्या महापालिकेत गेली पाच वर्षं भाजपचा एकही नगरसेवक नव्हता, त्या पालिकेत त्यांचं 'कमळ' फुललं आहे. ७० सदस्यांच्या महापालिकेत भाजपनं ४१ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलंय आणि काँग्रेसची सत्ता उलथून टाकलीय. काँग्रेसनं २८ जागा जिंकल्यात, तर राष्ट्रवादीला फक्त एक जागा मिळाली आहे.
त्याचवेळी, ६५ जागांच्या परभणी महापालिकेत काँग्रेसनं राष्ट्रवादीला धोबीपछाड दिला आहे. त्यांनी ३१ जागांवर आघाडी मिळवली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस सात जागांवर पुढे आहे. परभणीतही भाजपची कामगिरीही सुधारली असून त्यांनी आठ जागांपर्यंत मजल मारली आहे. गेल्या निवडणुकीत त्यांचे फक्त दोन नगरसेवक निवडून आले होते. शिवसेना सात जागांवर आघाडीवर आहे.
'जलदूत'मुळे फुललं 'कमळ'!
गेल्या वर्षीच्या दुष्काळात केंद्र सरकारनं 'जलदूत' या ट्रेननं लातूरकरांना पाणीपुरवठा केला होता. या 'प्यायल्या पाण्याला जागत' नागरिकांनी भाजपला भरभरून मतदान केल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. त्याशिवाय, संभाजीराव पाटील-निलंगेकरांच्या नियोजनबद्ध प्रचारनीतीचंही हे यश मानलं जातंय. याउलट, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अमित देशमुख यांनी व्यक्तिक्रेंद्री प्रचार केल्याचा फटका काँग्रेसला बसला आहे.
लातूरमध्ये काँग्रेसचे ४९, राष्ट्रवादीचे १३, शिवसेनेचे ६ आणि रिपाइंचे २ नगरसेवक होते. हे चित्र यावेळी साफ पालटलं आहे. काँग्रेसच्या २१ जागा कमी झाल्यात, तर राष्ट्रवादीला डझनभर जागा गमवाव्या लागल्यात. शिवसेना आणि रिपाइं तर सपाट झाले आहेत. त्यांच्या सगळ्या जागा भाजपला मिळाल्यात आणि आता ते लातूरमध्ये पहिल्यांदाच सत्ता स्थापन करणार आहेत.