म. टा. वृत्तसेवा, सोलापूर
चाळीस दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होणाऱ्या लातूरकरांची तहान आता सोलापूरचे उजनी धरण भागवणार आहे. उजनी धरणातील पाणी भीमा नदीत सोडून तेथून हे पाणी पंढरपूर रेल्वे स्थानकावरून रेल्वेने लातूरला घेऊन नेण्याचे निश्चित झाले असून, या संदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारकडून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. पाणी वाहून नेण्यासाठी आवश्यक यंत्रणेची तयारी सुरू असल्याचे प्रभू यांनी ट्विटरवरून गुरुवारी जाहीर केले.
‘उजनी धरणातील राखीव पाणी भीमा नदीत सोडून ते पंढरपूरला आणण्यात येणार आहे. तेथून ते रेल्वेने लातूरला नेण्यात येणार आहे. लातूर शहराजवळील हरंगुळ येथे हे रेल्वे टँकर उतरवून तेथून शहराला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी चर्चा केली असून लातूरकरांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वेने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे लवकरच सोलापूरचे उजनी धरण लातूरकरांची तहान भागवणार आहे,’ असे सूत्रांनी स्पष्ट केले.
मराठवाडा भीषण दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत असून, लातूर शहरात पाण्याचे दुर्भिक्ष्य मोठ्या प्रमाणावर आहे. नदी, तलाव तसेच विहरी कोरड्या ठणठणीत पडल्या आहेत. बोअरलासुद्धा पाणी लागत नाही त्यामुळे महिनाभरानंतर मिळणाऱ्या पाण्यावरच येथील जनता अवलंबून आहे. केवळ लातूरच नव्हे तर बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतसुद्धा पाणी प्रश्न बिकट बनला आहे.
पाणी वाहून नेण्यासाठी आवश्यक यंत्रणेची आम्ही तयारी करत आहोत. त्यानंतर राज्य सरकारच्या नियोजनानुसार पाणी पुरवठा करण्यात येईल. - सुरेश प्रभू, रेल्वेमंत्री
चाळीस दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होणाऱ्या लातूरकरांची तहान आता सोलापूरचे उजनी धरण भागवणार आहे. उजनी धरणातील पाणी भीमा नदीत सोडून तेथून हे पाणी पंढरपूर रेल्वे स्थानकावरून रेल्वेने लातूरला घेऊन नेण्याचे निश्चित झाले असून, या संदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारकडून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. पाणी वाहून नेण्यासाठी आवश्यक यंत्रणेची तयारी सुरू असल्याचे प्रभू यांनी ट्विटरवरून गुरुवारी जाहीर केले.
‘उजनी धरणातील राखीव पाणी भीमा नदीत सोडून ते पंढरपूरला आणण्यात येणार आहे. तेथून ते रेल्वेने लातूरला नेण्यात येणार आहे. लातूर शहराजवळील हरंगुळ येथे हे रेल्वे टँकर उतरवून तेथून शहराला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी चर्चा केली असून लातूरकरांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वेने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे लवकरच सोलापूरचे उजनी धरण लातूरकरांची तहान भागवणार आहे,’ असे सूत्रांनी स्पष्ट केले.
मराठवाडा भीषण दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत असून, लातूर शहरात पाण्याचे दुर्भिक्ष्य मोठ्या प्रमाणावर आहे. नदी, तलाव तसेच विहरी कोरड्या ठणठणीत पडल्या आहेत. बोअरलासुद्धा पाणी लागत नाही त्यामुळे महिनाभरानंतर मिळणाऱ्या पाण्यावरच येथील जनता अवलंबून आहे. केवळ लातूरच नव्हे तर बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतसुद्धा पाणी प्रश्न बिकट बनला आहे.
पाणी वाहून नेण्यासाठी आवश्यक यंत्रणेची आम्ही तयारी करत आहोत. त्यानंतर राज्य सरकारच्या नियोजनानुसार पाणी पुरवठा करण्यात येईल. - सुरेश प्रभू, रेल्वेमंत्री