म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठा’च्या उभारणीसाठी १४८ कोटी रुपयांची गरज आहे. त्याचे अंदाजपत्रक शासनाला सादर करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी दोन वर्षांत विद्यापीठ उभारणीचे आश्वासन दिल्याने प्रशासनाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
राज्यात नऊ वर्षांपासून राष्ट्रीय विधी विद्यापीठ स्थापनेची चर्चा सुरू होती. विद्यार्थी कोठे स्थापन करावे, यावरून वाद झाल्यानंतर औरंगाबादसह मुंबई, नागपूर अशा तीन ठिकाणी विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय झाला. औरंगाबादच्या विधी विद्यापीठाचे वर्ग यावर्षीपासून सुरू झाले. विद्यापीठाच्या औपचारिक उद्घाटनानंतर विद्यापीठ उभारणीला प्रशासकीय पातळीवरून वेग आला आहे. निवासी स्वरुपाचे असलेले हे विद्यापीठ कांचनवाडीच उभारले जावे, असा प्रशासनाचा आग्रह आहे. त्यासाठी जागेसह खर्चाचे अंदाजपत्रकही राज्यशासनाला सादर करण्यात येणार आहे. करोडी येथे विद्यापीठाला जागा देण्यात आली होती, मात्र विद्यापीठाला कांचनवाडीतच जागा हवी आहे. वसतिगृहाची सुविधा उपलब्ध असल्याने विद्यापीठाचा खर्च टळला आहे. त्यामुळे इतर इमारतींच्या उभारणीसाठी लागणाऱ्या खर्चाचा हा अंदाज आहे. त्यामध्ये प्रशासकीय इमारत, कुलगुरूंचे निवासस्थान, अधिकारी निवासस्थान, पार्किंग व्यवस्था, विश्रामगृह, मैदान, जीम, स्विमिंगपूल अशा अत्याधुनिक सोयीसुविधांचा समावेश असणार आहे.
विद्यार्थ्यांना १४ किलोमिटरचा फेरा
विद्यापीठाचे वसतिगृह कांचनवाडीत आहे. वर्ग पद्मपुरा येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात भरतात. विद्यार्थ्यांना रोज कॉलेजसाठी १४ किलोमिटरचा फेरा मारावा लागतो. वसतिगृहापासून कॉलेजपर्यंत विद्यार्थ्यांची येण्याची अडचण लक्षात घेत विद्यापीठाने स्वतःची गाडी खरेदी केली आहे. विद्यापीठ उभारले तर, हा फेरा थांबणार आहे.
जागेची अशी मागणी
विद्यापीठ स्थापनेसाठी किमान ५० एकर जागा आवश्यक असते. विधी विद्यापीठाला हवी असलेली जागा कांचनवाडी परिसरातच हवी आहे. सरकारी अधिकाऱ्यांसाठी बांधण्यात आलेली निवासस्थानाची जागा विद्यापीठाला वसतिगृह म्हणून देण्यात आली आहे. आठ एकर जागेवर हे वसतिगृह सुरू करण्यात आले आहे. त्याबाजुलाच महसूल विभागाची नऊ एकर जागा आहे. त्याजागेसह वाल्मीची ३८ एकर अशी एकूण ५५ एकर जागा शासनाकडे मागण्यात आली आहे. ही प्रक्रिया झाल्यानंतरच उभारणीचा संपूर्ण आराखडा शासनाला सादर केला जाणार आहे.
‘महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठा’च्या उभारणीसाठी १४८ कोटी रुपयांची गरज आहे. त्याचे अंदाजपत्रक शासनाला सादर करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी दोन वर्षांत विद्यापीठ उभारणीचे आश्वासन दिल्याने प्रशासनाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
राज्यात नऊ वर्षांपासून राष्ट्रीय विधी विद्यापीठ स्थापनेची चर्चा सुरू होती. विद्यार्थी कोठे स्थापन करावे, यावरून वाद झाल्यानंतर औरंगाबादसह मुंबई, नागपूर अशा तीन ठिकाणी विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय झाला. औरंगाबादच्या विधी विद्यापीठाचे वर्ग यावर्षीपासून सुरू झाले. विद्यापीठाच्या औपचारिक उद्घाटनानंतर विद्यापीठ उभारणीला प्रशासकीय पातळीवरून वेग आला आहे. निवासी स्वरुपाचे असलेले हे विद्यापीठ कांचनवाडीच उभारले जावे, असा प्रशासनाचा आग्रह आहे. त्यासाठी जागेसह खर्चाचे अंदाजपत्रकही राज्यशासनाला सादर करण्यात येणार आहे. करोडी येथे विद्यापीठाला जागा देण्यात आली होती, मात्र विद्यापीठाला कांचनवाडीतच जागा हवी आहे. वसतिगृहाची सुविधा उपलब्ध असल्याने विद्यापीठाचा खर्च टळला आहे. त्यामुळे इतर इमारतींच्या उभारणीसाठी लागणाऱ्या खर्चाचा हा अंदाज आहे. त्यामध्ये प्रशासकीय इमारत, कुलगुरूंचे निवासस्थान, अधिकारी निवासस्थान, पार्किंग व्यवस्था, विश्रामगृह, मैदान, जीम, स्विमिंगपूल अशा अत्याधुनिक सोयीसुविधांचा समावेश असणार आहे.
विद्यार्थ्यांना १४ किलोमिटरचा फेरा
विद्यापीठाचे वसतिगृह कांचनवाडीत आहे. वर्ग पद्मपुरा येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात भरतात. विद्यार्थ्यांना रोज कॉलेजसाठी १४ किलोमिटरचा फेरा मारावा लागतो. वसतिगृहापासून कॉलेजपर्यंत विद्यार्थ्यांची येण्याची अडचण लक्षात घेत विद्यापीठाने स्वतःची गाडी खरेदी केली आहे. विद्यापीठ उभारले तर, हा फेरा थांबणार आहे.
जागेची अशी मागणी
विद्यापीठ स्थापनेसाठी किमान ५० एकर जागा आवश्यक असते. विधी विद्यापीठाला हवी असलेली जागा कांचनवाडी परिसरातच हवी आहे. सरकारी अधिकाऱ्यांसाठी बांधण्यात आलेली निवासस्थानाची जागा विद्यापीठाला वसतिगृह म्हणून देण्यात आली आहे. आठ एकर जागेवर हे वसतिगृह सुरू करण्यात आले आहे. त्याबाजुलाच महसूल विभागाची नऊ एकर जागा आहे. त्याजागेसह वाल्मीची ३८ एकर अशी एकूण ५५ एकर जागा शासनाकडे मागण्यात आली आहे. ही प्रक्रिया झाल्यानंतरच उभारणीचा संपूर्ण आराखडा शासनाला सादर केला जाणार आहे.