म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अंतिम फेरीला मंगळवारी सुरुवात झाली. पहिल्या दिवशी एकही विद्यार्थ्यांने प्रवेश घेतला नाही. शहरातील १०२ कॉलेजांमधील दहा हजार ४१ जागा रिक्त आहेत. अनुदानित कॉलेजांमधील यात सर्वाधिक जागांचा समावेश आहे.
अकरावी प्रवेश प्रक्रियेचा शेवटचा टप्पा सुरू आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने सोमवारी रिक्त जागांची आकडेवारी जाहीर केली. त्यानंतर मंगळवारपासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी व थेट कॉलेजांमध्ये जाऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करायची आहे. जुलै-ऑगस्टच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण, एटीकेटी, भरलेल्या अर्जात त्रुटी आहेत, या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही फेरी आहे. रिक्त जागांच्या तुलनेत विद्यार्थीच शिल्लक नसल्याचे समोर आले आहे. पहिल्या दिवशी एकाही विद्यार्थ्यांने प्रवेश घेतल्याची नोंद नसल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले. त्यामुळे या फेरीत किती प्रवेश होतील यावर प्रश्नचिन्ह आहे. अद्याप शहरातील कॉलेजांमध्ये दहा हजार ४१ जागा रिक्त आहेत. त्यात सर्वाधिक तीन हजार ७७४ कला शाखेच्या जागा रिक्त आहेत. त्यानंतर विज्ञान विषयाचा क्रमांक लागतो. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना १९ ते २५ सप्टेंबरपर्यंत या फेरीमध्ये ऑनालाइन अर्ज भरून याचदरम्यान प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घ्यावा लागणार आहे. नऊ जूनपासून प्रक्रिया सुरू असून, चार महिने प्रक्रिया चालते आहे. त्यानंतर ही रिक्त जागांचा आकडा मोठा आहे.
‘एटीकेटी’ ५९४
दहावीत दोन विषयांत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना ‘एटीकेटी’ची सवलत देत अकरावीला प्रवेश दिला जातो. २०११पासून योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो आहे. यंदा ऑनलाइन प्रक्रियेत पहिल्या टप्प्या या विद्यार्थ्यांना प्रवेश दिले गेले नाहीत. नियमित फेरीनंतर या विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली. त्यासह अंतिम फेरीतही या विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली आहे. विशेष फेरीमध्ये एटीकेटी मिळालेल्या ५९४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.
एकूण कॉलेज....१०२
प्रवेश क्षमता......२४११०
रिक्त...............१००४१
रिक्त जागा
कला शाखा..... ३७७४
वाणिज्य...........१३१७
विज्ञान.............३६१८
एमसीव्ही..........१३३२
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अंतिम फेरीला मंगळवारी सुरुवात झाली. पहिल्या दिवशी एकही विद्यार्थ्यांने प्रवेश घेतला नाही. शहरातील १०२ कॉलेजांमधील दहा हजार ४१ जागा रिक्त आहेत. अनुदानित कॉलेजांमधील यात सर्वाधिक जागांचा समावेश आहे.
अकरावी प्रवेश प्रक्रियेचा शेवटचा टप्पा सुरू आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने सोमवारी रिक्त जागांची आकडेवारी जाहीर केली. त्यानंतर मंगळवारपासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी व थेट कॉलेजांमध्ये जाऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करायची आहे. जुलै-ऑगस्टच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण, एटीकेटी, भरलेल्या अर्जात त्रुटी आहेत, या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही फेरी आहे. रिक्त जागांच्या तुलनेत विद्यार्थीच शिल्लक नसल्याचे समोर आले आहे. पहिल्या दिवशी एकाही विद्यार्थ्यांने प्रवेश घेतल्याची नोंद नसल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले. त्यामुळे या फेरीत किती प्रवेश होतील यावर प्रश्नचिन्ह आहे. अद्याप शहरातील कॉलेजांमध्ये दहा हजार ४१ जागा रिक्त आहेत. त्यात सर्वाधिक तीन हजार ७७४ कला शाखेच्या जागा रिक्त आहेत. त्यानंतर विज्ञान विषयाचा क्रमांक लागतो. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना १९ ते २५ सप्टेंबरपर्यंत या फेरीमध्ये ऑनालाइन अर्ज भरून याचदरम्यान प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घ्यावा लागणार आहे. नऊ जूनपासून प्रक्रिया सुरू असून, चार महिने प्रक्रिया चालते आहे. त्यानंतर ही रिक्त जागांचा आकडा मोठा आहे.
‘एटीकेटी’ ५९४
दहावीत दोन विषयांत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना ‘एटीकेटी’ची सवलत देत अकरावीला प्रवेश दिला जातो. २०११पासून योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो आहे. यंदा ऑनलाइन प्रक्रियेत पहिल्या टप्प्या या विद्यार्थ्यांना प्रवेश दिले गेले नाहीत. नियमित फेरीनंतर या विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली. त्यासह अंतिम फेरीतही या विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली आहे. विशेष फेरीमध्ये एटीकेटी मिळालेल्या ५९४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.
एकूण कॉलेज....१०२
प्रवेश क्षमता......२४११०
रिक्त...............१००४१
रिक्त जागा
कला शाखा..... ३७७४
वाणिज्य...........१३१७
विज्ञान.............३६१८
एमसीव्ही..........१३३२