अ‍ॅपशहर

शिवरायांच्या पुतळ्याच्या लोकार्पणाच्या वादात आता भाजपची उडी; महापालिकेला दिला इशारा

Aurangabad Chhatrapati Shivaji Maharaj Statue : शहरातील क्रांती चौकात बसवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या लोकार्पणाच्या वेळेवरुन सुरू असलेल्या वादात आता भाजपने उडी घेतली आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byटीम मटा ऑनलाइन | Maharashtra Times 17 Feb 2022, 5:13 pm
औरंगाबाद: शहरातील क्रांती चौकात बसवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या लोकार्पणाच्या वेळेवरुन सुरू असलेल्या वादात आता भाजपने उडी घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य आश्वारुढ पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी निश्चित करण्यात आलेली मध्यरात्रीची वेळ अनाकलनीय, खेदजनक व संताप आणणारी असल्याचं म्हणत, भाजपकडून मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Maharashtra Aurangabad Chhatrapati Shivaji Maharaj Statue Unveil controvercy BJP Says The time of midnight is incomprehensible


यावेळी बोलताना भाजपचे शहराध्यक्ष संजय केनेकर म्हणाले, हिंदु संस्कृती रुढीप्रमाणे सुर्य साक्षीला जाताना कुठल्याही चांगल्या कामाचा शुभारंभ होत असतो. परंतु आपण ह्या संस्कृतीला हेतु पुरस्पर फाटा देवून मध्य रात्रीचा मुहुर्त निवडला असल्याचा आरोप केनेकर यांनी केला आहे. त्यामुळे शिवरायांच्या पुतळ्याचे भव्य दिव्य सोहळा शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला ५ वाजता किंवा १९ तारखेच्या सकाळी आनंदी व उत्साही वातावरणात करण्याची मागणी भाजपने केली आहे.

नऊ मंत्र्यांच्या उपस्थितीत होणार पुतळ्याचे अनावरण

औरंगाबाद शहरातील क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्यदिव्य स्मारकाचे अनावरण १८ फेब्रुवारीला रात्री १२ वाजता होणार आहे. ऑनलाइन उपस्थित असणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण होणार आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री सुभाष देसाई, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, रावसाहेब दानवे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, रोहयोमंत्री संदिपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार तसेच जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार सोहळ्याला प्रत्यक्ष उपस्थित असतील.

पुतळ्याचं काम पूर्ण

शहरातील क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा विराजमान व्हावा यासाठी शिवप्रेमींना मोठा संघर्ष करावा लागला आहे. मात्र आता त्यांच्या संघर्षाला यश आले असून, महाराजांचा अश्वारूढ पुतळा क्रांती चौकात बसवण्यात आला आहे. २५ फूट उंच आणि तब्बल ०८ टन वजन असलेला पुतळ्याचे काम पूर्ण झालं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज