अ‍ॅपशहर

मंत्रिमंडळ विस्तार २०१८मध्ये?

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची गेल्या तीन महिन्यांपासून नुसतीच चर्चा आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्यास मुहूर्त लागणार आहे.

Maharashtra Times 28 Dec 2017, 5:36 am
<< Makarand.Kulkarni@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम maharashtra cabinet expansion in new year
मंत्रिमंडळ विस्तार २०१८मध्ये?


औरंगाबाद ः राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची गेल्या तीन महिन्यांपासून नुसतीच चर्चा आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्यास मुहूर्त लागणार आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळाची विस्ताराची शक्यता असून भाजपकडून आणखी तीन जणांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाणार आहे. त्यात मुंबईच्या अॅड. आशिष शेलारांसह दोन नव्या दमाच्या चेहऱ्यांचा समावेश केला जाणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज होणार, उद्या होणार याविषयी नुसतीच चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्र्यांनी याला होकार दिला, मात्र विस्तार कधी होणार याबाबत साशंकता होती. गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतरच याबाबत निर्णय घेण्याचे सूतोवाच दिल्लीतून झाल्यामुळे नागपूर हिवाळी अधिवेशनात विस्ताराची चर्चा थंडावली होती.

दोन्ही राज्यातील सरकार स्थापनेनंतर आता पुन्हा मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेने वेग घेतला आहे. मुंबईतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळात समावेश करावयाच्या नावाची यादी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे यापूर्वीच पाठविण्यात आली आहे. या आठवड्यात किंवा नवीन वर्षाच्या पहिल्या तीन-चार दिवसांत त्यावर चर्चा होऊन नावे निश्चित होतील.

पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण राणे यांचा समावेश निश्चित मानले जात आहे. त्यांना भाजपच्या कोट्यातून मंत्रिपद दिले जाईल. राणेंशिवाय आणखी तिघांचा समावेश होईल. त्यात मुंबईचे अॅड. आशिष शेलार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.

मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी देताना त्यांच्या कामाचा आवाका, भविष्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेसह, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला टक्कर देण्याचा निकष प्राधान्यक्रम म्हणून ठरविण्यात आला आहे.

दुय्यम खाते
विद्यमान मंत्रिमंडळातून काहींना डच्चू दिला जाईल, अशी चर्चा होती. पण निवडणुका आणि भविष्यातील वाटचाल पाहून या मंत्र्यांना काढून टाकण्यापेक्षा त्यांच्याकडे दुय्यम खाते सोपविण्याचा विचार श्रेष्ठींकडून केला गेला आहे. मंत्रिमंडळ विस्तार जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होईल, असे या सूत्रांनी स्पष्ट केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज