अ‍ॅपशहर

तिसरी लाट आली?; औरंगाबाद जिल्ह्यातील आजची आकडेवारी चिंता वाढवणारी

Aurangabad Corona Update : कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता तिसरी लाट दारावर येऊन ठेपली असल्याचं चित्र आता निर्माण झालं आहे. कारण औरंगाबाद जिल्ह्यातील आजच्या रुग्ण संख्येचा आकडा धडकी भरवणारा आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byटीम मटा ऑनलाइन | Maharashtra Times 12 Jan 2022, 9:23 pm
औरंगाबाद : कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता तिसरी लाट दारावर येऊन ठेपली असल्याचं चित्र आता निर्माण झालं आहे. कारण औरंगाबाद जिल्ह्यातील आजच्या रुग्ण संख्येचा आकडा धडकी भरवणारा आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात तब्बल ४८४ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाची चिंता वाढली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Corona patient


औरंगाबाद माहिती कार्यालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण ४८४ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. ज्यात मनपा हद्दीत ४१० रुग्णांचा समावेश असून, ग्रामीण भागातील ७४ नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर एकूण ७१ रुग्णांना सुट्टी देण्यात आली असून १८३९ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता सरकारकडून कडक निर्बंधाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र औरंगाबाद शहरात या नियमांची पायमल्ली होताना पाहायला मिळत आहे. दिवसा जमावबंदीचे आदेश असतानाही शहरातील मार्केटमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. विशेष करून शहरात होणारी ही गर्दी वाढत्या कोरोनाच कारण ठरत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात आली तरचं परिस्थिती नियंत्रणात येऊ शकते, अन्यथा यापेक्षाही भयंकर परिस्थितीचा सामना करावा लागेल असं अभ्यासक सांगतायत.

अशी वाढली रुग्ण संख्या

०१ जानेवारी : २६ रुग्ण
०२ जानेवारी : ३५ रुग्ण
०३ जानेवारी : ३७ रुग्ण
०४ जानेवारी : १०३ रुग्ण
०५ जानेवारी : १२० रुग्ण
०६ जानेवारी : १२८ रुग्ण
०७ जानेवारी : १८३ रुग्ण
०८ जानेवारी : १६२ रुग्ण
०९ जानेवारी : २३४ रुग्ण
१० जानेवारी : ३१७ रुग्ण
११ जानेवारी : ३४९ रुग्ण
१२ जानेवारी : ४८४रुग्ण

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज