अ‍ॅपशहर

समर्थ रामदासांवरून ठाकरे सरकारने माफी मागावी

प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे राजपथावर झालेल्या पथ संचालनात महाराष्ट्राच्या चित्ररथावर समर्थ रामदास स्वामी यांना स्थान देण्यात न आल्याने जांब समर्थ ट्रस्टसह भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत राज्य शासनाने माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 5 Feb 2021, 6:21 pm
औरंगाबाद : प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे राजपथावर झालेल्या पथ संचालनात महाराष्ट्राच्या चित्ररथावर समर्थ रामदास स्वामी यांना स्थान देण्यात न आल्याने जांब समर्थ ट्रस्टसह भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत राज्य शासनाने माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम समर्थ रामदासांवरून ठाकरे सरकारने माफी मागावी


चित्ररथाचा विषय महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्राची संत पंरपरा असा निश्चित केला होता, परंतु या चित्ररथावर रामदास स्वामींची मूर्ती नव्हती, ही बाब खेदजनक असून यामुळे भाविकाच्या भावना दुखावल्याचे जांब समर्थ ट्रस्टचे विश्वस्त सुरेश देशपांडे यांनी पत्रकाद्वारे नमूद केले आहे. यासंदर्भात विश्वस्तासह भाविकांनी आमदार अतुल सावे यांची नुकतीच भेट घेत या भावना लोकप्रतिनिधी या नात्याने शासनाच्या दृष्टीपथास आणून द्याव्यात तसेच यापुढे कुठल्याही संताच्या बाबतीत अशी चूक होणार नाही, याची हमी द्यावी तसेच सर्व समर्थ भक्तांची महाराष्ट्र शासनाने माफी मागावी, अशी मागणी केली आहे. जांब समर्थ येथील ट्रस्टचे विश्वस्त सुरेश देशपांडे, श्री समर्थ रामदास स्वामी चॅरिटेबल ट्रस्टच्या सुषमा धांडे, अॅड. शंकर जाधव, अनंत भागवत, भालगाव येथील श्री राम मंदिर मठाचे उमेश भावगावकर, सुरेश महाराज रामदासी, महेशचंद्र कवठेकर, महेश दोरवट पाटील, सुनील अत्रे, दत्ता पाटील, श्रीपाद मुळे, गणेश जोगलादेवीकर, रवींद्र भामरे आदींनी ही मागणी केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज