लातूर: बळीराजाची इच्छा असेल तर सरकार आपलंच येईल आणि या राज्याला शिवसेनेचाच मुख्यमंत्री मिळेल, असे महत्त्वपूर्ण विधान करतानाच आपलं सरकार स्थापन झाल्यानंतर सर्वप्रथम शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्याचा निर्णय घेतला जाईल, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ओल्या दुष्काळाचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यांना आश्वस्त केलं.
लातूर आणि नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करून उद्धव ठाकरे यांनी आज शेतकऱ्यांशी संवाद साधला. लातूरमधील अहमदपूर तालुक्यात खंडाळी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना उपस्थित शेतकऱ्यांनी आम्हाला शिवसेनेचा मुख्यमंत्री हवा, असे सांगितले. राज्यात शिवसेनेचं सरकार आल्यावर निश्चितच शेतकऱ्याला कर्जमाफी मिळेल, अशी आम्हाला आशा आहे, असा सूर शेतकऱ्यांमधून लावण्यात आला. त्यावर उद्धव यांनीही मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, असे सांगून टाकले.
राष्ट्रपती राजवटीचा डाव हाणून पाडू: राऊत
सरकार स्थापन करायचं असतं तर मी मुंबईतच बसलो असतो, मात्र सरकार स्थापन करण्यापेक्षा माझ्यासाठी तुमच्यावर आलेलं संकट दूर करणं ही प्राधान्याची बाब आहे. म्हणून मी तुमच्या भेटीला आलो आहे. तुमच्या चेहऱ्यावर मला आनंद पाहायचा आहे. जे गेलं आहे ते परत मिळणार नाही. त्यामुळे या संकटातून कसा मार्ग काढता येईल, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. या संकटावर मात करण्यासाठी शिवसेना खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभी आहे, अशा शब्दांत उद्धव यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतपिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचे निर्देशही उद्धव यांनी यावेळी संबंधितांना दिले.
दरम्यान, उद्धव यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, असे स्पष्ट शब्दांत सांगितल्याने भाजप-शिवसेना युतीतील पेच कायम राहण्याची शक्यता आहे.
सेनेने ठरवल्यास पर्यायी सरकार देऊ शकतो: NCP
सत्तास्थापनेचा तिढा कायम
प्रदेश भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठक संपल्यानंतर आज प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच महायुतीचं सरकार स्थापन होणार, असे सांगितले आहे. भाजपला शिवसेनेच्या प्रस्तावाची प्रतीक्षा आहे आणि आम्ही कोणत्याही चर्चेस तयार आहोत, असेही ते म्हणाले. त्यानंतर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी लगेचच माध्यमांना प्रतिक्रिया देत आमच्यात जे ठरलंय त्याबाबत लेखी हमी जोवर भाजप देत नाही तोपर्यंत कोणतीही चर्चा होऊ शकत नाही, असे स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. शिवसेना मुख्यमंत्रिपदासह सत्तेच्या समान वाटपावर ठाम असल्याचंही राऊत यांनी सांगितलं आहे. त्यात आता मुख्यमंत्रिपदावर उद्धव यांचीही भूमिका पुढे आल्याने सत्तेचा तिढा अधिकच गुंतागुंतीचा बनल्याचे दिसू लागले आहे.
नेतृत्व फडणवीसांचेच; BJPला हवा सेनेचा प्रस्ताव
लातूर आणि नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करून उद्धव ठाकरे यांनी आज शेतकऱ्यांशी संवाद साधला. लातूरमधील अहमदपूर तालुक्यात खंडाळी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना उपस्थित शेतकऱ्यांनी आम्हाला शिवसेनेचा मुख्यमंत्री हवा, असे सांगितले. राज्यात शिवसेनेचं सरकार आल्यावर निश्चितच शेतकऱ्याला कर्जमाफी मिळेल, अशी आम्हाला आशा आहे, असा सूर शेतकऱ्यांमधून लावण्यात आला. त्यावर उद्धव यांनीही मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, असे सांगून टाकले.
राष्ट्रपती राजवटीचा डाव हाणून पाडू: राऊत
सरकार स्थापन करायचं असतं तर मी मुंबईतच बसलो असतो, मात्र सरकार स्थापन करण्यापेक्षा माझ्यासाठी तुमच्यावर आलेलं संकट दूर करणं ही प्राधान्याची बाब आहे. म्हणून मी तुमच्या भेटीला आलो आहे. तुमच्या चेहऱ्यावर मला आनंद पाहायचा आहे. जे गेलं आहे ते परत मिळणार नाही. त्यामुळे या संकटातून कसा मार्ग काढता येईल, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. या संकटावर मात करण्यासाठी शिवसेना खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभी आहे, अशा शब्दांत उद्धव यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतपिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचे निर्देशही उद्धव यांनी यावेळी संबंधितांना दिले.
दरम्यान, उद्धव यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, असे स्पष्ट शब्दांत सांगितल्याने भाजप-शिवसेना युतीतील पेच कायम राहण्याची शक्यता आहे.
सेनेने ठरवल्यास पर्यायी सरकार देऊ शकतो: NCP
सत्तास्थापनेचा तिढा कायम
प्रदेश भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठक संपल्यानंतर आज प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच महायुतीचं सरकार स्थापन होणार, असे सांगितले आहे. भाजपला शिवसेनेच्या प्रस्तावाची प्रतीक्षा आहे आणि आम्ही कोणत्याही चर्चेस तयार आहोत, असेही ते म्हणाले. त्यानंतर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी लगेचच माध्यमांना प्रतिक्रिया देत आमच्यात जे ठरलंय त्याबाबत लेखी हमी जोवर भाजप देत नाही तोपर्यंत कोणतीही चर्चा होऊ शकत नाही, असे स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. शिवसेना मुख्यमंत्रिपदासह सत्तेच्या समान वाटपावर ठाम असल्याचंही राऊत यांनी सांगितलं आहे. त्यात आता मुख्यमंत्रिपदावर उद्धव यांचीही भूमिका पुढे आल्याने सत्तेचा तिढा अधिकच गुंतागुंतीचा बनल्याचे दिसू लागले आहे.
नेतृत्व फडणवीसांचेच; BJPला हवा सेनेचा प्रस्ताव