अ‍ॅपशहर

माणुसकीची दिवाळी साजरी

म टा प्रतिनिधी, औरंगाबादयंदा अत्यल्प पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे...

Maharashtra Times 13 Nov 2018, 4:00 am

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

यंदा अत्यल्प पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांचीही दिवाळी आनंदित व्हावी यासाठी कुलस्वामीनी प्रतिष्ठानतर्फे १५० शेतामध्ये राहणाऱ्या शेतकरी कुटुंबांना भेट देऊन त्यांना फराळ तसेच मिठाईचे वाटप करण्यात आले. शहर परिसरातील जटवाडा, बनवाडी, शंकरपूरवाडी, घोडेगाव, सोनखेडा, गोळेगाव, खिर्डी, मावसाळा या खेड्यांमध्ये फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी कुलस्वामिनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास कोरडे, सचिव अलका कोरडे तसेच अनिल गावंडे, अतिक पठाण, कुलकर्णी मामा, चंद्रमुनी जायभाय, अतुल सावजी, घुगे मामा, प्रहलाद गायकवाड, सर्जेराव देशमुख यांनी फराळ वाटप केले. दरम्यान प्रतिष्ठानतर्फे विलास कोरडे व अलका कोरडे यांनी दोनशे सफाई कामगारांना फराळ वाटप केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज