अ‍ॅपशहर

मराठा मोर्चेकऱ्यांच्या गाडीला अपघात; ३ ठार

मुंबईतील मराठा क्रांती मोर्चात सहभागी होऊन गावाकडं परतणाऱ्या मोर्चेकऱ्यांच्या गाडीला औरंगाबाद-नाशिक रोडवर झालेल्या अपघातात तीनजण जागीच ठार झाले आहेत, तर दोन जखमी झाले आहेत. जखमींवर वैजापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

Maharashtra Times 10 Aug 2017, 11:36 am
मटा ऑनलाइन वृत्त । औरंगाबाद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम maratha kranti morcha 3 dies in accident on aurangabad nashik road
मराठा मोर्चेकऱ्यांच्या गाडीला अपघात; ३ ठार


मुंबईतील मराठा क्रांती मोर्चात सहभागी होऊन गावाकडं परतणाऱ्या मोर्चेकऱ्यांच्या एका गाडीला औरंगाबाद-नाशिक रोडवर झालेल्या अपघातात तीनजण जागीच ठार झाले आहेत, तर दोन जखमी झाले आहेत. जखमींवर वैजापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

अपघातग्रस्त मोर्चेकरी वाळुज महानगर येथील राहणारे होते. मोर्चा संपवून ते (एमएच २० इइ७२६४) या क्रमांकाच्या वर्ना गाडीनं घराकडं परतत होते. औरंगाबाद-नाशिक रोडवरील येवला गावाजवळ असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. हा अपघात इतका भयानक होता की गाडीचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. त्यात नारायण थोरात (गाजगाव), अविनाश गव्हाणे (बजाज नगर, इटावा), गौरव प्रजापती (बजाज नगर) हे तिघे जागीच ठार झाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज