म. टा. प्रतिनिधी, अंबाजोगाई
ग्रामीण भागातील साहित्य रसिकांनी आवर्जून हजेरी लावत मराठवाडा साहित्य संमेलनाला प्रतिसाद दिला. अंबाजोगाई येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करावे, धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन अंबाजोगाई जिल्हा निर्मिती करावी यासह इतर ठराव समारोपाच्या सत्रात करण्यात आले.
३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचा समारोप सोमवारी सायंकाळी करण्यात आला. यावेळी संमेलनाध्यक्ष प्रा. रंगनाथ तिवारी, खासदार प्रीतम मुंडे, समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे, ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, स्वागताध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. या सत्रात वेगवेगळे ठराव मांडण्यात आले. अंबाजोगाईला मराठी विद्यापीठ स्थापन करावे व अंबाजोगाई जिल्हा निर्मिती करावी, हे दोन प्रमुख ठराव त्यात आहेत.
संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी ग्रामीण शिक्षणः समस्या आणि उपाय व बालभारतीतील धडे या विषयांवर परिसंवाद झाले.
तरुणांची गर्दी कमी
परिसंवाद, कविसंमेलन, गझल संमेलन ऐकण्यासाठी गर्दी झाली. पुस्तक विक्रीला दुसऱ्या दिवशी समाधानकारक प्रतिसाद मिळाला. शालेय विद्यार्थ्यांची गर्दी असली तरी पुस्तक खरेदी करणारे मोजकेच रसिक आहेत, असे विक्रेत्यांनी सांगितले. तरुणांचा साहित्य संमेलनात कमी सहभाग होता. तुलनेने ग्रामीण भागातील रसिकांनी आवर्जून सहभाग घेतला.
ग्रामीण भागातील साहित्य रसिकांनी आवर्जून हजेरी लावत मराठवाडा साहित्य संमेलनाला प्रतिसाद दिला. अंबाजोगाई येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करावे, धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन अंबाजोगाई जिल्हा निर्मिती करावी यासह इतर ठराव समारोपाच्या सत्रात करण्यात आले.
३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचा समारोप सोमवारी सायंकाळी करण्यात आला. यावेळी संमेलनाध्यक्ष प्रा. रंगनाथ तिवारी, खासदार प्रीतम मुंडे, समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे, ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, स्वागताध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. या सत्रात वेगवेगळे ठराव मांडण्यात आले. अंबाजोगाईला मराठी विद्यापीठ स्थापन करावे व अंबाजोगाई जिल्हा निर्मिती करावी, हे दोन प्रमुख ठराव त्यात आहेत.
संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी ग्रामीण शिक्षणः समस्या आणि उपाय व बालभारतीतील धडे या विषयांवर परिसंवाद झाले.
तरुणांची गर्दी कमी
परिसंवाद, कविसंमेलन, गझल संमेलन ऐकण्यासाठी गर्दी झाली. पुस्तक विक्रीला दुसऱ्या दिवशी समाधानकारक प्रतिसाद मिळाला. शालेय विद्यार्थ्यांची गर्दी असली तरी पुस्तक खरेदी करणारे मोजकेच रसिक आहेत, असे विक्रेत्यांनी सांगितले. तरुणांचा साहित्य संमेलनात कमी सहभाग होता. तुलनेने ग्रामीण भागातील रसिकांनी आवर्जून सहभाग घेतला.