म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते लासूर स्टेशन येथे बोलत होते. जानकीदेवी बजाज फाउंडेशनच्या 'सीएसआर' निधीतून २६२ कोटी खर्चाच्या जलसंधारण कामाची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मधूर बजाज, सी. के. त्रिपाठी, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर उपस्थित होते. आमदार प्रशांत बंब यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. जानकीदेवी बजाज फाउंडेशनचे सी.के. त्रिपाठी यांनी प्रास्तविकात सांगितले की, आमदार बंब यांच्या प्रयत्नाने दहा टक्के लोकवर्गणी भरून जानकीदेवी बजाज फाउंडेशनच्या राहुल बजाज यांनी 'सीएसआर' निधीतून गंगापूर तालुक्यासाठी २६२ कोटीचा निधी मंजूर केला आहे. गंगापूर तालुक्यातील १०८ गावांमध्ये जलसंधारणाची कामे करण्यात येणार आहे. यामुळे २५ हजार ८४७ कुटुंबे आणि एक लाख ४४ हजार ६५७ लोकसंख्येला याचा लाभ मिळणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,'देशाच्या स्वातंत्र्य इतिहासात बजाज कुटुंबाने मोलाची भूमिका बजावली आहे. महात्मा गांधी साबरमतीपेक्षा जास्त काळ वर्धा येथे राहिले. याचे खरे श्रेय बजाज कुटुंबाला जाते. जमनालाल बजाज यांनी स्वातंत्र्य लढ्यात तन, मन, धन उपलब्ध करून दिले. देशाच्या निर्मितीत अग्रगण्य समूह म्हणून 'बजाज' पुढे आले. यशस्वी उद्योजक म्हणून बजाज यांनी काम केले आहे. वर्धा येथे गांधींच्या स्वप्नातील गाव निर्माण होत आहे. बजाज फाउंडेशनसोबत ११० कोटींचा करार करण्यात आला आहे.'
दुष्काळी परिस्थितीबाबत मुख्यमंत्री म्हणाले, 'महाराष्ट्रापुढे दुष्काळाची मोठी समस्या आहे. राज्यात १५ हजार गावांमध्ये दुष्काळ आहे. एक वर्ष चांगले गेले, तर दुसऱ्या वर्षी दुष्काळ येतो. दुष्काळावर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार योजनेत तीन वर्षांत ११ हजार गावे दुष्काळमुक्त झाली आहेत. येत्या दोन वर्षांत पाच हजार गावे दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्नशील आहे. यामध्ये सामान्य नागरिकांनी ५०० कोटी रुपये देऊन सहभाग दिला आहे. बुलडाणा जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून १५० जेसीबी यंत्रांचे पूजन शनिवारी झाले. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनेत औरंगाबाद जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांच्या खात्यात कर्ज रक्कम जमा झाली आहे. कर्जमाफी हा अंतिम उपाय नाही. त्यासाठी शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होऊ देऊ नये, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. शेतकरी स्वावलंबीपणे उभा राहिला पाहिजे.'
बजाज ऑटो कंपनीचे राहुल बजाज प्रकृती ठीक नसल्यामुळे या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाही. त्यांनी प्रतिनिधी म्हणून मधूर बजाज कार्यक्रमाला उपस्थित होते.
गंगापूर तालुक्यात तीन वर्षांत चौथी भेट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन वर्षांत चारवेळा गंगापूर तालुक्यात हजेरी लावलेली आहे. आमदार बंब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्नेहसंबंधाबाबत मतदारसंघात चर्चा आहे. नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी गंगापूर येथे, आरापूर येथील गंगागिरी महाराजांच्या अखंड हरिनाम सप्ताहासाठी, लासूर स्टेशन येथे महाआरोग्य शिबिरासाठी आणि बजाज कंपनीच्या जलसंधारणाच्या कामाच्या शुभारंभासाठी लासूर स्टेशन येथे मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट दिली आहे.
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते लासूर स्टेशन येथे बोलत होते. जानकीदेवी बजाज फाउंडेशनच्या 'सीएसआर' निधीतून २६२ कोटी खर्चाच्या जलसंधारण कामाची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मधूर बजाज, सी. के. त्रिपाठी, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर उपस्थित होते. आमदार प्रशांत बंब यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. जानकीदेवी बजाज फाउंडेशनचे सी.के. त्रिपाठी यांनी प्रास्तविकात सांगितले की, आमदार बंब यांच्या प्रयत्नाने दहा टक्के लोकवर्गणी भरून जानकीदेवी बजाज फाउंडेशनच्या राहुल बजाज यांनी 'सीएसआर' निधीतून गंगापूर तालुक्यासाठी २६२ कोटीचा निधी मंजूर केला आहे. गंगापूर तालुक्यातील १०८ गावांमध्ये जलसंधारणाची कामे करण्यात येणार आहे. यामुळे २५ हजार ८४७ कुटुंबे आणि एक लाख ४४ हजार ६५७ लोकसंख्येला याचा लाभ मिळणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,'देशाच्या स्वातंत्र्य इतिहासात बजाज कुटुंबाने मोलाची भूमिका बजावली आहे. महात्मा गांधी साबरमतीपेक्षा जास्त काळ वर्धा येथे राहिले. याचे खरे श्रेय बजाज कुटुंबाला जाते. जमनालाल बजाज यांनी स्वातंत्र्य लढ्यात तन, मन, धन उपलब्ध करून दिले. देशाच्या निर्मितीत अग्रगण्य समूह म्हणून 'बजाज' पुढे आले. यशस्वी उद्योजक म्हणून बजाज यांनी काम केले आहे. वर्धा येथे गांधींच्या स्वप्नातील गाव निर्माण होत आहे. बजाज फाउंडेशनसोबत ११० कोटींचा करार करण्यात आला आहे.'
दुष्काळी परिस्थितीबाबत मुख्यमंत्री म्हणाले, 'महाराष्ट्रापुढे दुष्काळाची मोठी समस्या आहे. राज्यात १५ हजार गावांमध्ये दुष्काळ आहे. एक वर्ष चांगले गेले, तर दुसऱ्या वर्षी दुष्काळ येतो. दुष्काळावर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार योजनेत तीन वर्षांत ११ हजार गावे दुष्काळमुक्त झाली आहेत. येत्या दोन वर्षांत पाच हजार गावे दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्नशील आहे. यामध्ये सामान्य नागरिकांनी ५०० कोटी रुपये देऊन सहभाग दिला आहे. बुलडाणा जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून १५० जेसीबी यंत्रांचे पूजन शनिवारी झाले. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनेत औरंगाबाद जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांच्या खात्यात कर्ज रक्कम जमा झाली आहे. कर्जमाफी हा अंतिम उपाय नाही. त्यासाठी शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होऊ देऊ नये, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. शेतकरी स्वावलंबीपणे उभा राहिला पाहिजे.'
बजाज ऑटो कंपनीचे राहुल बजाज प्रकृती ठीक नसल्यामुळे या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाही. त्यांनी प्रतिनिधी म्हणून मधूर बजाज कार्यक्रमाला उपस्थित होते.
गंगापूर तालुक्यात तीन वर्षांत चौथी भेट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन वर्षांत चारवेळा गंगापूर तालुक्यात हजेरी लावलेली आहे. आमदार बंब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्नेहसंबंधाबाबत मतदारसंघात चर्चा आहे. नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी गंगापूर येथे, आरापूर येथील गंगागिरी महाराजांच्या अखंड हरिनाम सप्ताहासाठी, लासूर स्टेशन येथे महाआरोग्य शिबिरासाठी आणि बजाज कंपनीच्या जलसंधारणाच्या कामाच्या शुभारंभासाठी लासूर स्टेशन येथे मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट दिली आहे.