म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिकत असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना ‘मटा हेल्पलाइन’द्वारे मदत करण्यात आली. पाच गुणवंत विद्यार्थ्यांना विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते धनादेश प्रदान करण्यात आले. यावेळी समाजाचे दातृत्व पाहून विद्यार्थी भावुक झाले.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवेल्या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’ दरवर्षी ‘मटा हेल्पलाइन’ उपक्रम राबवते. या उपक्रमाअंतर्गत पाच विद्यार्थ्यांना मदत करण्यात आली. देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विश्वकर्मा सभागृहात सोमवारी सायंकाळी कार्यक्रम झाला. यावेळी मंचावर विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, ‘कॉसमॉस बँके’चे व्यवस्थापक विठ्ठल गर्जे, देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. उल्हास शिऊरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. शुभम दांडगे, कोमल पळसकर, सूरज सवणे, ऋतुजा जाधव आणि रोहिणी जाधव या विद्यार्थ्यांना मान्यवरांनी धनादेश प्रदान केले.
शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याची जाणिव असलेले विद्यार्थी प्रतिकूल परिस्थितीवर सहज मात करतील, असा विश्वास डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी व्यक्त केला.
‘दर्जेदार शिक्षण आवश्यक असते. गरीब पालकांनी पोटाला चिमटा घेऊन मुलांना शिकवले. अडचण नसल्यास जागृती नसते. पोटात आग असेल, तर जाग असते. त्यामुळे अडचण कधी-कधी भाग्याची असते. संघर्षातून या मुलांना ताकद मिळून ते उत्तम यश मिळवतील,’ असे डॉ. भापकर म्हणाले. मागील वर्षी निवडलेली गुणवंत विद्यार्थिनी संघरक्षिता बिरारे हिने मनोगत मांडले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘महाराष्ट्र टाइम्स’चे वरिष्ठ सहाय्यक संपादक प्रमोद माने यांनी केले. गिरीधर पांडे यांनी सूत्रसंचालन केले आणि उन्मेष देशपांडे यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिकत असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना ‘मटा हेल्पलाइन’द्वारे मदत करण्यात आली. पाच गुणवंत विद्यार्थ्यांना विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते धनादेश प्रदान करण्यात आले. यावेळी समाजाचे दातृत्व पाहून विद्यार्थी भावुक झाले.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवेल्या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’ दरवर्षी ‘मटा हेल्पलाइन’ उपक्रम राबवते. या उपक्रमाअंतर्गत पाच विद्यार्थ्यांना मदत करण्यात आली. देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विश्वकर्मा सभागृहात सोमवारी सायंकाळी कार्यक्रम झाला. यावेळी मंचावर विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, ‘कॉसमॉस बँके’चे व्यवस्थापक विठ्ठल गर्जे, देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. उल्हास शिऊरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. शुभम दांडगे, कोमल पळसकर, सूरज सवणे, ऋतुजा जाधव आणि रोहिणी जाधव या विद्यार्थ्यांना मान्यवरांनी धनादेश प्रदान केले.
शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याची जाणिव असलेले विद्यार्थी प्रतिकूल परिस्थितीवर सहज मात करतील, असा विश्वास डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी व्यक्त केला.
‘दर्जेदार शिक्षण आवश्यक असते. गरीब पालकांनी पोटाला चिमटा घेऊन मुलांना शिकवले. अडचण नसल्यास जागृती नसते. पोटात आग असेल, तर जाग असते. त्यामुळे अडचण कधी-कधी भाग्याची असते. संघर्षातून या मुलांना ताकद मिळून ते उत्तम यश मिळवतील,’ असे डॉ. भापकर म्हणाले. मागील वर्षी निवडलेली गुणवंत विद्यार्थिनी संघरक्षिता बिरारे हिने मनोगत मांडले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘महाराष्ट्र टाइम्स’चे वरिष्ठ सहाय्यक संपादक प्रमोद माने यांनी केले. गिरीधर पांडे यांनी सूत्रसंचालन केले आणि उन्मेष देशपांडे यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.