म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गौताळा औट्रमघाट अभयारण्यासह जायकवाडी पक्षी अभयारण्याचा परिसर ‘इको सेन्सिटिव्ह झोन’ म्हणून घोषित झाला आहे. त्याची अधिसूचना पर्यावरण व वन मंत्रालयाने जारी केली आहे. त्यावर पुढील कार्यवाहीसाठी संनियंत्रण समितीची बैठक होणे अपेक्षित होते, मात्र अद्यापही या बैठकीला मुहूर्त मिळाला नाही.
जायकवाडी पक्षी अभयारण्याचा परिसर पर्यावरण संवेदनशील क्षेत्राची अंतिम अधिसूचना पर्यावरण व वन मंत्रालयाने १२ जुलै २०१७ रोजी जारी केली आहे. गौताळा औट्रमघाट अभयारण्यसंदर्भातील अधिसूचना जारी होऊन आठ महिने होत आहेत. अधिसूचना जारी झाल्याने आता या झोन क्षेत्रात हवा, पाणी आणि भूमी प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर बंदी अाहे. त्याचबरोबर या परिसरात अन्य निर्बंध आहेत. यासंदर्भात देखरेख, उपाययोजना करण्याची जबाबदारी ही संनियंत्रण समितीकडे देण्यात आली आहे. गौताळ्यासाठी औरंगाबाद जिल्हाधिकारी हे समितीचे अध्यक्ष असून, जळगाव जिल्हाधिकारी, दोन्ही जिल्ह्यांतील जिल्हा परिषदांचे प्रतिनिधी, महसूल, वन, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, पर्यावरण तज्ज्ञ असे एकूण १३ सदस्य या समितीत आहेत. औरंगाबादचे उप वन संरक्षक सदस्य सचिव असतील. औरंगबाद जिल्हाधिकारी हे जायकवाडी अभयारण्यच्या संनियंत्रण समितीच्या अध्यक्ष असून, अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिनिधींसह वन व संबंधित विभागाचे अधिकारी, तज्ज्ञ आदी या समितीचे सदस्य असतील, असे निर्देश अधिसूचनेत देण्यात आले आहेत.
तज्ज्ञांची नियुक्ती नाही
अधिसूचना जारी झाल्यानंतर तातडीने संनियंत्रण समितीची बैठक होणे अपेक्षित होते, मात्र समितीची अद्यापही बैठक झाली नसून, तज्ज्ञ मंडळीची नियुक्ती करण्यात आली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. अधिसूचनेच्या अनुषंगाने गौताळा; तसेच जायकवाडी परिसरात जनजागृतीपर कार्यक्रम घेऊ, असे वन विभागातर्फे सांगण्यात आले होते, मात्र तशी कोणाताही कार्यक्रम अद्यापही हाती घेण्यात आला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
गौताळा औट्रमघाट अभयारण्यासह जायकवाडी पक्षी अभयारण्याचा परिसर ‘इको सेन्सिटिव्ह झोन’ म्हणून घोषित झाला आहे. त्याची अधिसूचना पर्यावरण व वन मंत्रालयाने जारी केली आहे. त्यावर पुढील कार्यवाहीसाठी संनियंत्रण समितीची बैठक होणे अपेक्षित होते, मात्र अद्यापही या बैठकीला मुहूर्त मिळाला नाही.
जायकवाडी पक्षी अभयारण्याचा परिसर पर्यावरण संवेदनशील क्षेत्राची अंतिम अधिसूचना पर्यावरण व वन मंत्रालयाने १२ जुलै २०१७ रोजी जारी केली आहे. गौताळा औट्रमघाट अभयारण्यसंदर्भातील अधिसूचना जारी होऊन आठ महिने होत आहेत. अधिसूचना जारी झाल्याने आता या झोन क्षेत्रात हवा, पाणी आणि भूमी प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर बंदी अाहे. त्याचबरोबर या परिसरात अन्य निर्बंध आहेत. यासंदर्भात देखरेख, उपाययोजना करण्याची जबाबदारी ही संनियंत्रण समितीकडे देण्यात आली आहे. गौताळ्यासाठी औरंगाबाद जिल्हाधिकारी हे समितीचे अध्यक्ष असून, जळगाव जिल्हाधिकारी, दोन्ही जिल्ह्यांतील जिल्हा परिषदांचे प्रतिनिधी, महसूल, वन, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, पर्यावरण तज्ज्ञ असे एकूण १३ सदस्य या समितीत आहेत. औरंगाबादचे उप वन संरक्षक सदस्य सचिव असतील. औरंगबाद जिल्हाधिकारी हे जायकवाडी अभयारण्यच्या संनियंत्रण समितीच्या अध्यक्ष असून, अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिनिधींसह वन व संबंधित विभागाचे अधिकारी, तज्ज्ञ आदी या समितीचे सदस्य असतील, असे निर्देश अधिसूचनेत देण्यात आले आहेत.
तज्ज्ञांची नियुक्ती नाही
अधिसूचना जारी झाल्यानंतर तातडीने संनियंत्रण समितीची बैठक होणे अपेक्षित होते, मात्र समितीची अद्यापही बैठक झाली नसून, तज्ज्ञ मंडळीची नियुक्ती करण्यात आली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. अधिसूचनेच्या अनुषंगाने गौताळा; तसेच जायकवाडी परिसरात जनजागृतीपर कार्यक्रम घेऊ, असे वन विभागातर्फे सांगण्यात आले होते, मात्र तशी कोणाताही कार्यक्रम अद्यापही हाती घेण्यात आला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.