औरंगाबाद: अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून अटक करण्यात आलीय. मालिकांच्या समर्थनात महाविकास आघाडीकडून राज्यभरात आंदोलन केली जात आहे. मात्र आता मालिकांच्या समर्थनात वेळ पडल्यास एमआयएम सुद्धा रस्त्यावर उतरेल असं वक्तव्य एमआयएमचे नेते आणि खासदार इम्तियाज जलील यांनी केलं आहे. औरंगाबादमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना जलील म्हणाले की, नवाब मलिक याचं आम्ही पूर्णपणे समर्थन करतो, आम्ही त्यांच्यासोबत उभे आहोत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शहरात मालिकांच्या समर्थनात काढलेला मोर्चा, पाठिंबा देण्यासाठी नव्हे तर, तिन्ही पक्षातून कुणाचे जास्त लोकं आली आहे हे पाहण्यासाठी काढला होता, असा आरोप जलील यांनी केला. तर नवाब मलिकांच्या पाठीमागे आम्ही उभा राहण्याचे कारण म्हणजे, देशातील मुस्लिमांना तुम्ही दहशतवाद्यांशी जोडू शकत नाही, तुम्हाला इतर काय आरोप करायचे करा, पण मुस्लिमांना या नजरने पाहू नका. त्यामुळे जर वेळ पडली तर आम्ही सुद्धा आमची ताकद दाखवण्यासाठी रस्त्यावर उतरु शकतो, असंही जलील म्हणाले.
पुढे बोलताना जलील म्हणाले की, आम्ही जर मालिकांच्या समर्थानात रस्त्यावर उतरलो तर महाविकास आघाडीच्या लोकांपेक्षा अधिक आमचे लोकं असतील. शरद पवारांना ईडीने फक्त चौकशीसाठी बोलावले तर तिथे त्यांचे सर्व भक्त जमा झाले होते. मात्र जेव्हा नवाब मलिक, आझम खान, छगन भुजबळ आतमध्ये जातात तेव्हा कुणीही येत नाही, हा फक्त दिखावा असल्याचा आरोपही यावेळी जलील यांनी केला.
ईडीची मलिकांवर कारवाई, महाविकास आघाडीचं राज्यभरात आंदोलन
मंत्री नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) २३ फेब्रुवारी रोजी यांना अटक करण्यात आली आहे. अंडरवर्ल्डशी संबंधित असलेल्या व्यक्तीकडून जमीन खरेदीचा आरोप मलिक यांच्यावर आहे. भल्या सकाळी घरी येऊन ईडीने त्यांची तब्बल सात तास चौकशी केली. मॅरेथॉन चौकशीनंतर नवाब मलिकांना ईडीने अटक केली. ईडीच्या कारवाईनंतर 'झुकेंगे नहीं' म्हणत मलिकांनी आपले पुढील इरादे स्पष्ट केले आहेत. मलिकांच्या समर्थनार्थ राज्यभरात महाविकास आघाडीकडून आंदोलने करण्यात येत आहेत.
यावेळी बोलताना जलील म्हणाले की, नवाब मलिक याचं आम्ही पूर्णपणे समर्थन करतो, आम्ही त्यांच्यासोबत उभे आहोत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शहरात मालिकांच्या समर्थनात काढलेला मोर्चा, पाठिंबा देण्यासाठी नव्हे तर, तिन्ही पक्षातून कुणाचे जास्त लोकं आली आहे हे पाहण्यासाठी काढला होता, असा आरोप जलील यांनी केला. तर नवाब मलिकांच्या पाठीमागे आम्ही उभा राहण्याचे कारण म्हणजे, देशातील मुस्लिमांना तुम्ही दहशतवाद्यांशी जोडू शकत नाही, तुम्हाला इतर काय आरोप करायचे करा, पण मुस्लिमांना या नजरने पाहू नका. त्यामुळे जर वेळ पडली तर आम्ही सुद्धा आमची ताकद दाखवण्यासाठी रस्त्यावर उतरु शकतो, असंही जलील म्हणाले.
पुढे बोलताना जलील म्हणाले की, आम्ही जर मालिकांच्या समर्थानात रस्त्यावर उतरलो तर महाविकास आघाडीच्या लोकांपेक्षा अधिक आमचे लोकं असतील. शरद पवारांना ईडीने फक्त चौकशीसाठी बोलावले तर तिथे त्यांचे सर्व भक्त जमा झाले होते. मात्र जेव्हा नवाब मलिक, आझम खान, छगन भुजबळ आतमध्ये जातात तेव्हा कुणीही येत नाही, हा फक्त दिखावा असल्याचा आरोपही यावेळी जलील यांनी केला.
ईडीची मलिकांवर कारवाई, महाविकास आघाडीचं राज्यभरात आंदोलन
मंत्री नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) २३ फेब्रुवारी रोजी यांना अटक करण्यात आली आहे. अंडरवर्ल्डशी संबंधित असलेल्या व्यक्तीकडून जमीन खरेदीचा आरोप मलिक यांच्यावर आहे. भल्या सकाळी घरी येऊन ईडीने त्यांची तब्बल सात तास चौकशी केली. मॅरेथॉन चौकशीनंतर नवाब मलिकांना ईडीने अटक केली. ईडीच्या कारवाईनंतर 'झुकेंगे नहीं' म्हणत मलिकांनी आपले पुढील इरादे स्पष्ट केले आहेत. मलिकांच्या समर्थनार्थ राज्यभरात महाविकास आघाडीकडून आंदोलने करण्यात येत आहेत.