अ‍ॅपशहर

'अयोध्या महत्वाची नाही, जनता महागाईने त्रस्त'; मंत्री जयंत पाटील यांचा राज ठाकरे, केंद्रावर निशाणा

जलसंपदा मंत्री जंयंत पाटील यांनी राज ठाकरेंसह केंद्र सरकावर नाव न घेता निशाणा साधला आहे. अयोध्या दौरा महत्वाचा नसून जनतेचे प्रश्न महत्वाचे असल्याचे म्हणत जयंत पाटील यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरे आणि भाजप, केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. जनता महागाईने त्रस्त असल्याचे सांगत त्यांनी अयोध्या दौरा काढणाऱ्या नेत्यांवर टीकेचे प्रहार केले आहेत.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byसुनील तांबे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 May 2022, 9:10 pm
औरंगाबाद: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासह केंद्र सरकारवर (Union Govt) नाव न घेता निशाणा साधला आहे. अयोध्याही महत्वाची नाही आणि इकडे तिकडे उभे राहण्याचे आवाहनही महत्वाचे नाही. भारताची जनता महागाईने हतबल झाली आहे. २०१९ मध्ये घेतलेला निर्णय चुकल्याचे भारतीयांच्या लक्षात आले आहे. ती चूक जनता येत्या काळात नक्कीच सुधारेल, असे म्हणत जयंत पाटील यांनी टीकास्त्र सोडले आहे. (minister jayant patil criticizes mns chief raj thackeray and union govt)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम minister jayant patil criticizes mns chief raj thackeray and union govt
'अयोध्या महत्वाची नाही, जनता महागाईने त्रस्त'; मंत्री जयंत पाटील यांचा राज ठाकरे, केंद्रावर निशाणा


जयंत पाटील हे आज ८ मे रोजी औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी चिकलठाणा विमानतळावर माध्यमांशी बोलताना त्यांनी केंद्र सरकार व राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. महाराष्ट्रातील नेते अयोध्येत जात आहेत. राज ठाकरे हे देखील ५ जून रोजी अयोध्येत जाणार असल्याच्या प्रश्नावर यांनी मिश्किल टिप्पणी केली. ते म्हणाले, मला माहीत नाही अयोध्येत जाऊन काय करतात. अयोध्येत जाऊन रामाची भक्ती करत असतील तर रामजी बुद्धी देईल, ती बुद्धी सर्वधर्म समावेशकच राहील. असा टोला राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज ठाकरेंना लगावला.

क्लिक करा आणि वाचा- तुकडेबंदीचे परिपत्रक औरंगाबाद खंडपीठाकडून रद्द, गुंठ्यामध्ये जमीन खरेदी विक्री होणार?

तर, खासदार नवनीत राणा यांनी न्यायालयाच्या निर्देशानंतरही माध्यमांशी संवाद साधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेतून निवडून यावे असे आवाहन केले होते. या प्रकरणी मंत्री पाटील यांनी ज्या पक्षाचे अनेक आमदार, खासदार निवडून येतात त्या पक्षाच्या प्रमुखाला असे आवाहन करणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया पाटील यांनी व्यक्त केली. न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केले नसेल तर न्यायालय योग्य ती कारवाई करील असेही पाटील पुढे म्हणाले.

सरकारच्या वर्षपूर्तीचा दिवस, मुख्यमंत्र्यांचा बसमधून प्रवास, जनतेला ५ मोठ्या योजनांची भेट
'औरंगाबादेतील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी मदत करू'

सध्या औरंगाबाद शहराला नियमित पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांचे ऐन उन्हाळ्यात प्रचंड हाल होत आहेत. हे योग्य नाही. मनपा प्रशासनाने याकडे लक्ष दिले पाहिजे. मनपाला जलसंपदा विभागाची गरज पडल्यास आमची साथ राहील असेही मंत्री जयंत पाटील म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- रोहित पवारांचा थेट अयोध्येतून भाजप-मनसेवर निशाणा; धार्मिक मुद्द्याचं राजकारण केल्याचा आरोप

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज